- संतोष येलकरअकोला: कपाशी, सोयाबीन व तुरीचे दर घसरल्याने, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल पडून आहे. गरज भागविण्यासाठी कमी दरात शेतमाल विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. त्यामुळे मिळणाºया कमी दरात शेतमाल विकावा की नाही, असा पेच शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.दुष्काळी परिस्थितीत पिकांचे उत्पादन बुडाल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. नापिकीच्या स्थितीत शेतमालास चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकºयांकडून करण्यात येत असतानाच, गत महिन्याच्या तुलनेत कपाशी, सोयाबीन व तूर इत्यादी शेतमालाच्या दरात प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर घसरण झाली आहे. शेतमालाला कमी भाव मिळत असल्याने भाव वाढण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकºयांच्या घरात कपाशी, सोयाबीन आणि तूर इत्यादी शेतमाल अद्याप पडून आहे. शेतमालाच्या दरात वाढ होत नसल्याने, गरज भागविण्यासाठी मिळणाºया कमी दरात घरातील शेतमाल विकण्याची वेळ आता शेतकºयांवर आली आहे. त्यामुळे शेतमालाला योग्य दर केव्हा मिळणार, याबाबत प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकºयांसमोर गरज भागविण्यासाठी मिळणाºया कमी दरात शेतमाल विकावा की नाही, असा निर्माण झाला आहे.