शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

ढगाळ वातावरणाचा खरीप, रब्बी पिकांना धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 11:07 IST

हरभरा पीक उत्तम आहे; परंतु त्यावरही घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्मिती झाली आहे, या वातावरणामुळे रब्बी व खरीप हंगामातील पिकांवर कीड, रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी धास्तावला आहे. कापूस पिकांवरील बोंडअळीने पुन्हा डोके वर काढले असून, तूर, हरभरा पिकांना हे वातावरण पोषक ठरत आहे.यावर्षीच्या समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. तसेच खरीप हंगामातील कापूस, तूर आदी पिके शेतात उभी आहेत. तुरीला सध्या फुलांचा बहर व बहुतांश ठिकाणी शेंगा धरल्या आहेत. या वातावरणामुळे शेंगा पोखरणाºया अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तर हरभºयावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तूर पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना तूर पिकावर कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. हरभºयाची पेरणी उशिरापर्यंत सुरू होती.ज्यांनी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हरभरा पेरणी केली. तेथील हरभरा पीक उत्तम आहे; परंतु त्यावरही घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.सुरुवातीला मान्सून उशिरा पोहोचल्याने मूग, उडीद पीक हातचे गेले, नंतरच्या अतिपावसामुळे सोयाबीन काळे पडले आणि उत्पादनही घटले.कपाशीचेही उत्पादन कमी होत असल्याने शेतकºयांची भिस्त तूर व रब्बी हंगामातील पिकांवर आहे; परंतु पाऊस पाठ सोडत नसून, सारखे ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे फवारणीचा खर्च वाढण्याचीही शक्यता आहे.फळ पिकांवर परिणामविदर्भाच्या उत्तर भागावर थंड आणि बाष्पयुक्त वाºयाची धडक होत असल्याने सध्या पाऊस पडत आहे. ही परिस्थिती आणखी एक ते दोन दिवस टिकण्याची शक्यता आहे. त्यानंतर वातावरण मोकळे होऊन हळूहळू थंडीच्या प्रमाणात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. पुढील दोन-तीन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे. हे वातवरण असेच राहिल्यास फळ पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण२२ डिसेंबरपर्यंत तुरळक भागात ढगाळ वातवरण राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली आहे. त्यामुळे किमान तापमान १५.० अंशावर राहण्याची शक्यता आहे. १७ डिसेंबर रोजी किमान तापमान १६.० राहील. १८ ला ते २० डिसेंबरपर्यंत १५ अंश २१ ला १६.० अंश तर २२ डिसेंबर रोजी हेच किमान तापमान १७.० अंश राहण्याची शक्यता आहे.ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणाºया तर हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. शेतकºयांनी नियमित शेताचे सर्वेक्षण करावे. किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास शिफारसीनुसार कीटकनाशक फवारणी करावी.- डॉ. मोहनराव खाकरे,ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ, अकोला.

 

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी