शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

ढगाळ वातावरणाचा खरीप, रब्बी पिकांना धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 11:07 IST

हरभरा पीक उत्तम आहे; परंतु त्यावरही घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्मिती झाली आहे, या वातावरणामुळे रब्बी व खरीप हंगामातील पिकांवर कीड, रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी धास्तावला आहे. कापूस पिकांवरील बोंडअळीने पुन्हा डोके वर काढले असून, तूर, हरभरा पिकांना हे वातावरण पोषक ठरत आहे.यावर्षीच्या समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. तसेच खरीप हंगामातील कापूस, तूर आदी पिके शेतात उभी आहेत. तुरीला सध्या फुलांचा बहर व बहुतांश ठिकाणी शेंगा धरल्या आहेत. या वातावरणामुळे शेंगा पोखरणाºया अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तर हरभºयावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तूर पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना तूर पिकावर कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. हरभºयाची पेरणी उशिरापर्यंत सुरू होती.ज्यांनी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हरभरा पेरणी केली. तेथील हरभरा पीक उत्तम आहे; परंतु त्यावरही घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.सुरुवातीला मान्सून उशिरा पोहोचल्याने मूग, उडीद पीक हातचे गेले, नंतरच्या अतिपावसामुळे सोयाबीन काळे पडले आणि उत्पादनही घटले.कपाशीचेही उत्पादन कमी होत असल्याने शेतकºयांची भिस्त तूर व रब्बी हंगामातील पिकांवर आहे; परंतु पाऊस पाठ सोडत नसून, सारखे ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे फवारणीचा खर्च वाढण्याचीही शक्यता आहे.फळ पिकांवर परिणामविदर्भाच्या उत्तर भागावर थंड आणि बाष्पयुक्त वाºयाची धडक होत असल्याने सध्या पाऊस पडत आहे. ही परिस्थिती आणखी एक ते दोन दिवस टिकण्याची शक्यता आहे. त्यानंतर वातावरण मोकळे होऊन हळूहळू थंडीच्या प्रमाणात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. पुढील दोन-तीन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे. हे वातवरण असेच राहिल्यास फळ पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण२२ डिसेंबरपर्यंत तुरळक भागात ढगाळ वातवरण राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली आहे. त्यामुळे किमान तापमान १५.० अंशावर राहण्याची शक्यता आहे. १७ डिसेंबर रोजी किमान तापमान १६.० राहील. १८ ला ते २० डिसेंबरपर्यंत १५ अंश २१ ला १६.० अंश तर २२ डिसेंबर रोजी हेच किमान तापमान १७.० अंश राहण्याची शक्यता आहे.ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणाºया तर हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. शेतकºयांनी नियमित शेताचे सर्वेक्षण करावे. किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास शिफारसीनुसार कीटकनाशक फवारणी करावी.- डॉ. मोहनराव खाकरे,ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ, अकोला.

 

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी