शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ढगाळ वातावरणाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 11:22 IST

पिकांना आवश्यक तापमानच मिळत नसल्याने रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांची अनेक भागात वाढ खुंटली आहे.

अकोला : विदर्भात सतत पाऊस व ढगाळ वातावरण राहत असल्याने रब्बी व खरीप पिकांवर प्रतिकूल परिणाम होत असून, गहू, हरभरा पिकांवर किडीसह मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.गत वर्षातील पावसाळा नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबला. यावर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाही ढगाळ वातावरण असून, अधून-मधून पाऊस सुरू च आहे. त्यामुळे पिकांना आवश्यक तापमानच मिळत नसल्याने रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांची अनेक भागात वाढ खुंटली आहे. हरभरा पिकांवर मर रोग व घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. विदर्भात यावर्षी हरभरा पिकाची पेरणी डिसेंबर महिन्यापर्यंत तर गव्हाची पेरणी यावर्षी जानेवारी महिन्यापर्यंत करण्यात आली. उशिरा पेरणी केलेल्या हरभºयाची वाढ खुंटली आहे. गतवर्षीचा कापूस यावर्षी जानेवारी महिन्यात बहरला असून, सर्वत्र शेतं पांढरी शुभ्र दिसत आहेत; परंतु ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अगोदरच कापूस पिकावर डिसेंबर महिन्यापासून बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे अनेक भागातील शेतकºयांनी कापसाच्या पिकावर नांगर फिरविला आहे. या सर्व प्रतिकूल नैसर्गिक वातावरणाचा परिणाम पीक उत्पादनावर होण्याची शक्यता तज्ज्ञांकरवी वर्तविण्यात येत आहे. हे वातावरण असेच राहिल्यास हरभºयावरील घाटेअळीचा प्रकोप वाढण्याची शक्यताही तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सध्या काही भागात खरीप हंगामातील तूर काढणीचे काम सुरू आहे, तर काही शेतकºयांनी तूर काढून वाळण्यासाठी शेतात पेंड्या उभ्या केल्या आहेत. तूर वाळल्याशिवाय मळणी करता येत नसल्याने शेतात उभ्या असलेल्या या पिकांनाही पावसाचा धोका निर्माण झाला आहे. ढगाळ वातावरणासोबतच वादळवारा सुटल्यास संत्रा, मोसंबी आणि लिंबू पिकांसह भाजीपाला पिकांचेदेखील नुकसान होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी