शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

ढगाळ वातावरणाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 11:22 IST

पिकांना आवश्यक तापमानच मिळत नसल्याने रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांची अनेक भागात वाढ खुंटली आहे.

अकोला : विदर्भात सतत पाऊस व ढगाळ वातावरण राहत असल्याने रब्बी व खरीप पिकांवर प्रतिकूल परिणाम होत असून, गहू, हरभरा पिकांवर किडीसह मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.गत वर्षातील पावसाळा नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबला. यावर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाही ढगाळ वातावरण असून, अधून-मधून पाऊस सुरू च आहे. त्यामुळे पिकांना आवश्यक तापमानच मिळत नसल्याने रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांची अनेक भागात वाढ खुंटली आहे. हरभरा पिकांवर मर रोग व घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. विदर्भात यावर्षी हरभरा पिकाची पेरणी डिसेंबर महिन्यापर्यंत तर गव्हाची पेरणी यावर्षी जानेवारी महिन्यापर्यंत करण्यात आली. उशिरा पेरणी केलेल्या हरभºयाची वाढ खुंटली आहे. गतवर्षीचा कापूस यावर्षी जानेवारी महिन्यात बहरला असून, सर्वत्र शेतं पांढरी शुभ्र दिसत आहेत; परंतु ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अगोदरच कापूस पिकावर डिसेंबर महिन्यापासून बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे अनेक भागातील शेतकºयांनी कापसाच्या पिकावर नांगर फिरविला आहे. या सर्व प्रतिकूल नैसर्गिक वातावरणाचा परिणाम पीक उत्पादनावर होण्याची शक्यता तज्ज्ञांकरवी वर्तविण्यात येत आहे. हे वातावरण असेच राहिल्यास हरभºयावरील घाटेअळीचा प्रकोप वाढण्याची शक्यताही तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सध्या काही भागात खरीप हंगामातील तूर काढणीचे काम सुरू आहे, तर काही शेतकºयांनी तूर काढून वाळण्यासाठी शेतात पेंड्या उभ्या केल्या आहेत. तूर वाळल्याशिवाय मळणी करता येत नसल्याने शेतात उभ्या असलेल्या या पिकांनाही पावसाचा धोका निर्माण झाला आहे. ढगाळ वातावरणासोबतच वादळवारा सुटल्यास संत्रा, मोसंबी आणि लिंबू पिकांसह भाजीपाला पिकांचेदेखील नुकसान होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी