शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

ढगाळ वातावरणाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 11:22 IST

पिकांना आवश्यक तापमानच मिळत नसल्याने रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांची अनेक भागात वाढ खुंटली आहे.

अकोला : विदर्भात सतत पाऊस व ढगाळ वातावरण राहत असल्याने रब्बी व खरीप पिकांवर प्रतिकूल परिणाम होत असून, गहू, हरभरा पिकांवर किडीसह मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.गत वर्षातील पावसाळा नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबला. यावर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाही ढगाळ वातावरण असून, अधून-मधून पाऊस सुरू च आहे. त्यामुळे पिकांना आवश्यक तापमानच मिळत नसल्याने रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांची अनेक भागात वाढ खुंटली आहे. हरभरा पिकांवर मर रोग व घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. विदर्भात यावर्षी हरभरा पिकाची पेरणी डिसेंबर महिन्यापर्यंत तर गव्हाची पेरणी यावर्षी जानेवारी महिन्यापर्यंत करण्यात आली. उशिरा पेरणी केलेल्या हरभºयाची वाढ खुंटली आहे. गतवर्षीचा कापूस यावर्षी जानेवारी महिन्यात बहरला असून, सर्वत्र शेतं पांढरी शुभ्र दिसत आहेत; परंतु ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अगोदरच कापूस पिकावर डिसेंबर महिन्यापासून बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे अनेक भागातील शेतकºयांनी कापसाच्या पिकावर नांगर फिरविला आहे. या सर्व प्रतिकूल नैसर्गिक वातावरणाचा परिणाम पीक उत्पादनावर होण्याची शक्यता तज्ज्ञांकरवी वर्तविण्यात येत आहे. हे वातावरण असेच राहिल्यास हरभºयावरील घाटेअळीचा प्रकोप वाढण्याची शक्यताही तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सध्या काही भागात खरीप हंगामातील तूर काढणीचे काम सुरू आहे, तर काही शेतकºयांनी तूर काढून वाळण्यासाठी शेतात पेंड्या उभ्या केल्या आहेत. तूर वाळल्याशिवाय मळणी करता येत नसल्याने शेतात उभ्या असलेल्या या पिकांनाही पावसाचा धोका निर्माण झाला आहे. ढगाळ वातावरणासोबतच वादळवारा सुटल्यास संत्रा, मोसंबी आणि लिंबू पिकांसह भाजीपाला पिकांचेदेखील नुकसान होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी