शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
2
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
3
Top Marathi News LIVE: बोरीवलीतील अॅनेक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
4
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
6
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
7
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
8
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
9
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
10
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
11
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
12
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
13
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
14
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
15
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
16
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
18
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
19
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
20
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
Daily Top 2Weekly Top 5

बंद बसेसमुळे हाल

By admin | Updated: May 10, 2014 23:44 IST

तोकड्या बस सेवेमुळे हजारो प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागतो.

सिंदखेडराजा : तालुक्यात सर्वात मोठे शहर वजा गाव असलेले साखरखेर्डा हे आडवळणी असून, येथे २0 हजार लोकसंख्या आहे. मेहकर, चिखली, खामगाव आगाराने नियमीत चालणार्‍या बसेस बंद केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तोकड्या बस सेवेमुळे हजारो प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागतो. सिंदखेडराजा पासून ६0 किमी, चिखलीपासून ३५ किमी आणि मेहकरपासून २२ किमी अंतरावर साखरखेर्डा गाव आहे. पलसिद्ध महास्वामी यांचा १ वर्षापूर्वीचा मठ आणि प.पू.प्रल्हाद महाराज (रामदासी) यांचे संस्थान यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून या नगरीत भाविक येत असतात. २५ एप्रिल ते ५ मे या ११ दिवसांच्या कालावधीत सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांचा अमृत महोत्सव आणि नविन मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम संपन्न झाला आहे. या महोत्सवात किमान ५0 हजाराहून अधिक भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. येणार्‍या भाविकांना चिखली,मेहकर, खामगाव, जालना पर्यंत येणे सोपे होते. परंतु तेथून साखरखेर्डा जाणे बस नसल्यामुळे अवघड झाले होते. मेरा चौकी, लव्हाळा चौकी आणि दुसरबीड येथे येवून साखरखेर्डा जाणारे ऑटो, काळीपिवळी यासारखे खासगी वाहने शोधावी लागतात. तीही खचाखच भरल्यानंतरच पुढील प्रवासाला निघते, त्यातही दुप्पट भाडे असा हा जीवघेणा प्रवास साखरखेर्डा येथे येणार्‍या प्रवाशांना करावा लागतो. मेहकर आगाराने तर नियमीत चालणारी आणि नियमापेक्षा अधिक उत्पन्न देणारी साखरखेर्डा, जालना व परत जालना, साखरखेर्डा, सवडद मुक्कामी जाणारी बस १५ दिवसांपासून बंद आहे. याबरोबरच अनेक बसेस बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यात काही बसेसचे टायर बसणे, नळी लिकेज होणे हा नित्याचा क्रम झाला आहे. यावर मात्र लोकप्रतिनिधीसह संबंधितांचेही साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. चिखली आगाराकडे चिखली-लोणार, चिखली-मेहकर, चिखली-वाशिम ह्या बंद केलेल्या बसेस सुरु करण्याची वारंवार मागणी करुनही बसेस सुरु करण्यात नाहीत. खामगाव आगाराचे आगारप्रमुख यांनी साखरखेर्डा मार्गावरुन अकोला- किनगावजट्ट, खामगाव-लोणार, खामगाव-जालना ह्या तीन बसेस धावतात. त्यात खामगाव ते जालना या बसमध्ये नियमापेक्षा दुप्पट प्रवाशी वाहतूक होते. साखरखेर्डा येथून बसणार्‍या प्रवाशांना बसमध्ये जागा मिळत नाही. ८५ किमी उभे राहून त्यांना प्रवास करावा लागतो. खामगाव ते जालना-औरंगाबाद ही पुन्हा एक बस सुरु करावी. तसेच खामगाव ते शेंदुर्जन ही बंद केलेली बस पुन्हा सुरु करावी, अशी मागणी जोर धरत असून, तेथे आमदाराचे पत्र मागितले जाते. प्रवाशांना भर उन्हाळ्यात कित्येक तास बसची प्रतिक्षा करावी लागते. तेव्हा बंद केलेल्या बसेस तात्काळ पुर्ववत सुरु कराव्या, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.