शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सामाजिक शास्त्र विषयाच्या आलेखाचे गुण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 13:11 IST

सामाजिक शास्त्र २, भूगोल विषयाच्या आलेखाच्या प्रश्नांचे पैकीच्या पैकी गुण दिले जातील, असे आश्वासन दिले.

अकोला: इयत्ता दहावीच्या सामाजिक शास्त्र पेपर २ च्या प्रश्नपत्रिकेसोबत आलेख उत्तर पुरवणी देण्यात न आल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार होते; परंतु यासंदर्भात शिक्षक महासंघाचे शेखर भोयर यांनी शनिवारी शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषयाच्या आलेखाचे गुण देण्याची मागणी केली. त्यानुसार विभागीय सचिवांनी विद्यार्थ्यांना अन्याय करणार नसून, त्यांना सामाजिक शास्त्र २, भूगोल विषयाच्या आलेखाच्या प्रश्नांचे पैकीच्या पैकी गुण दिले जातील, असे आश्वासन दिले.इयत्ता दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गुणांच्या आधारे विद्यार्थी विविध शाखांना प्रवेश घेतात; परंतु दहावीच्या सामाजिक शास्त्र २ व भूगोल विषयाची परीक्षा २२ मार्च रोजी पार पडली. परीक्षेदरम्यान सामाजिक शास्त्र २, भूगोल प्रश्नपत्रिकेला आलेख पुरवणी (उत्तरपत्रिका) देणे आवश्यक होते. दरवर्षी या पेपर मध्ये आलेखावरील प्रश्न असतोच व आलेख उत्तरपत्रिकासुद्धा पुरविल्या जातात; परंतु यंदा शिक्षण मंडळाने आलेख उत्तरपत्रिका दिल्या नाहीत. भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न क्र. ६ (अ) हा सांख्यिकीय माहितीच्या आधारे आलेख काढण्याच्या पद्धतीचा होता; परंतु परीक्षेदरम्यान परीक्षा मंडळाकडून आलेखच प्राप्त न झाल्यामुळे ऐनवेळी हा प्रश्न कसा सोडवावा, अशी समस्या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाली. आलेख उत्तरपत्रिका न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी हा प्रश्न तसाच सोडून दिला. त्यामुळे या प्रश्नाचे गुण मिळतील की नाही, असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला होता. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचे नुकसान होऊ नये, परीक्षा मंडळाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना तो प्रश्न सोडविता आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचे गुणदान करण्याची मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक शेखर भोयर यांनी अमरावती विभागीय परीक्षा मंडळाच्या सचिवांसोबतच परीक्षा मंडळ सचिव, पुणे यांच्याकडे केली. विभागीय सचिवांनी विद्यार्थ्यांना आलेखाच्या प्रश्नाचे पैकीच्या पैकी गुण दिले जातील, असे आश्वासन दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीEducationशिक्षण