शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘आधार’च्या चुका दुरुस्तीसाठी केंद्राअभावी नागरिक निराधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:23 IST

अकोला : नागरिकांना आधार कार्डची डोकेदुखी कायम आहेच, ज्यांना मिळाले, त्यांचा मोबाइल क्रमांक अपडेट नाही, अनेकांचे बोटांचे ठसे जुळत नाहीत, पाच वर्ष वयोगटासोबतच नवजात बालकांच्या आधारची नोंद नाही. या समस्या निकाली काढण्यासाठी शासनाने आधार नोंदणी, दुरुस्तीची कायमस्वरूपी सोय करण्याचे ठरवले असताना अकोला शहर आणि जिल्ह्यात आवश्यक १३0 किटसपैकी एकही नव्याने मिळाली नसल्याची माहिती आहे. त्यातच सुरू असलेल्या ४९ पैकी दोन केंद्रात नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणात रक्कम उकळल्याने ती काळ्य़ा यादीत टाकण्याची कारवाई करण्यात

ठळक मुद्देजिल्ह्यात केंद्र वाढवण्याची तयारीच नाही : दोन केंद्र काळ्य़ा यादीत

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नागरिकांना आधार कार्डची डोकेदुखी कायम आहेच, ज्यांना मिळाले, त्यांचा मोबाइल क्रमांक अपडेट नाही, अनेकांचे बोटांचे ठसे जुळत नाहीत, पाच वर्ष वयोगटासोबतच नवजात बालकांच्या आधारची नोंद नाही. या समस्या निकाली काढण्यासाठी शासनाने आधार नोंदणी, दुरुस्तीची कायमस्वरूपी सोय करण्याचे ठरवले असताना अकोला शहर आणि जिल्ह्यात आवश्यक १३0 किटसपैकी एकही नव्याने मिळाली नसल्याची माहिती आहे. त्यातच सुरू असलेल्या ४९ पैकी दोन केंद्रात नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणात रक्कम उकळल्याने ती काळ्य़ा यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे.शासनाच्या विविध योजनांचा लाभ देताना थेट हस्तांतरण पद्धत राबवण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यासाठी लाभार्थींकडे आधार क्रमांक, त्यासोबत मोबाइल क्रमांक संलग्नित असणे आवश्यक करण्यात आले. मात्र, ही पद्धत राबवताना सर्वाधिक अडचण आधार क्रमांकांशी मोबाइल क्रमांक संलग्नित नसणे, आधारमध्ये नोंदणी केलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी बोटांचे ठसे न जुळण्याचे हजारो प्रकार कर्जमाफीचे अर्ज दाखल करताना उघडकीस आले. त्यातच शालेय विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती खात्यात जमा करण्यातही प्रचंड अडचणी निर्माण झाल्या. या सगळ्य़ा प्रकारांच्या तक्रारी राज्यातील सर्वच जिल्हाधिकार्‍यांकडे झाल्या. त्याचवेळी आधार कार्डची नव्याने नोंदणी करणे, आधीच्या क्रमांकातील माहिती जुळत नसल्याने ती अद्ययावत करण्याची सोय कुठेच नव्हती. शासनाच्या कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन करताना या अडचणींचा सर्वाधिक सामना शेतकर्‍यांसह त्यांच्या कुटुंबीयांना करावा लागला. जिल्हाधिकारी कार्यालयात काही प्रमाणात आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणासाठी केंद्रं सुरू झाली. मात्र, समस्या सुटणार नाही, हे लक्षात घेता आधार नोंदणी केंद्र कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची वेळ शासनावर आली. त्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक महसूल मंडळाच्या गावात एक केंद्र, तर महापालिका क्षेत्रात २५ हजार लोकसंख्येच्या क्षेत्रासाठी एक केंद्र निर्मिती करण्याचे नियोजन शासनाने सप्टेंबर २0१७ मध्येच केले. त्यासाठी अकोला जिल्ह्यात कायमस्वरूपी नोंदणी केंद्राचे १३0 प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यासाठी किटसचा पुरवठा करणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यात एकही किट प्राप्त झाली नाही. त्यामुळे आधारची नव्याने नोंदणी, माहितीमध्ये दुरुस्तीची गरज असलेले नागरिक आधारसाठी सध्यातरी निराधार असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. 

अनेक केंद्रांमध्ये आधार नोंदणीसाठी लूटसद्यस्थितीत जिल्ह्यातील ५१ पैकी ४९ महसूल मंडळाच्या गावात आधार नोंदणी केंद्र आहे. त्यापैकी अनेक केंद्रामध्ये नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणात रक्कम उकळली जाते. हा प्रकार तक्रारीतून उघड झाल्याने जिल्ह्यातील दोन केंद्र काळ्य़ा यादीत टाकत बंदची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये कापसी, अकोल्यातील वाशिम बायपास परिसरातील केंद्राचा समावेश आहे. शहरात तीनच केंद्रात सध्या आधारची सोय आहे. त्यापैकी एका केंद्रात नागरिकांची आर्थिक लूट करण्याचा प्रकार घडत आहे. 

 

टॅग्स :Akola cityअकोला शहर