शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

चित्रा टॉकीजचा इतिहासच रक्तरंजित!

By admin | Updated: November 5, 2015 01:48 IST

तीन खून, दोन प्राणघातक हल्ले, मारहाण व धमक्यांच्या अनेक घटना.

सचिन राऊत / अकोला : प्रॉपर्टी ब्रोकर किशोर खत्री यांची हत्या ज्या निर्माणाधीन शॉपिंग मॉलच्या आर्थिक व्यवहारांमधील वादातून झाली, तो मॉल ज्या चित्रा चित्रपटगृहाच्या जागेवर उभा राहिला आहे, त्या जागेचा इतिहासच रक्तरंजित आहे. बालाजी ट्रस्टच्या मालकीच्या ज्या जागेवर आता शॉपिंग मॉल उभा झाला आहे, त्या जागेवर पूर्वी चित्रा टॉकीज व त्यामागे २0 खोल्या होत्या. गत ३0 ते ३५ वर्षांच्या कालावधीत या जागेसाठी तीन जणांची हत्या झाली, दोन जणांवर प्राणघातक हल्ले झाले आणि इतर अनेकांसंदर्भात मारहाण व धमकीच्या घटना घडल्या. किशोर खत्री यांच्या हत्याकांडाने या जागेच्या रक्तरंजित इतिहासाला पुन्हा उजाळा मिळाला असून, ही जागा आणखी किती जणांचा बळी घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या जागेचा ताबा १९७६ पासून बालाजी ट्रस्टचे सूर्यकांत कोलपेकर यांच्याकडे होता. या जागेच्या ताब्यासाठीच २३ जानेवारी १९८३ रोजी कोलपेकर यांच्यावर बॉम्ब फेकून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर नटवरलाल शहा यांच्यावर याच जागेसाठी प्राणघातक हल्ला झाला होता. शहा यांचे दोन्ही पाय तोडल्याने त्यांचा काही दिवसातच मृत्यू झाला होता. शहा यांच्या मृत्यूनंतर, चित्रा टॉकीजच्या पाठीमागील बाजूस असलेल्या २0 खोल्यांमधील भाडेकरूंना मारहाण करणे, त्यांना बंदुकीचा धाक दाखविणे, असे प्रकार सुरू झाले होते. दहशतीमुळे त्या २0 भाडेकरूंनी खोल्या खाली केल्या होत्या. टॉकीजच्या पाठीमागील जागा व खोल्या खाली झाल्यानंतर काही वर्षांनी, १८ डिसेंबर १९९१ रोजी चित्रा टॉकीजमध्ये सडक या चित्रपटाचा खेळ सुरू असताना, हरिहरपेठ भागातील रहिवासी असलेल्या नारायणे नामक वीट उत्पादकाची हत्या करण्यात आली होती. दोन हत्या, दोन प्राणघातक हल्ले व अनेकांना मारहाणीच्या घटना झाल्यानंतर चित्रा टॉकीज अनेक वर्ष भग्नावस्थेत उभी होती.