शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

बदलत्या वातावरणाचा आरोग्याला फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 15:23 IST

आरोग्याला जपण्यासाठी नागरिकांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

अकोला : दिवसा उकाडा, तर रात्री थंडी अशा दुहेरी वातावरणात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोलेकरांची डोकेदुखी वाढली आहे. सांधेदुखीसोबतच सर्दी, खोकला अन् तापीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आरोग्याला जपण्यासाठी नागरिकांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.उन्हाळा लागला तरी, रात्रीच्या तापमानात घट होत असल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे. अशातच अवकाळी पावसामुळे खोकला, अंगदुखी, घशाचा संसर्ग, ताप, डोकेदुखी आदींचा त्रास वाढला आहे. संसर्गजन्य आजारांसोबतच स्वाइन फ्लू होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फकटा लहान मुलांसोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला होत असून, दमा तसेच श्वसन विकार असलेल्या रुग्णांचेही प्रमाण गत काही दिवसांपासून वाढले आहे. अ‍ॅलर्जी झाल्यानंतर ज्या प्रकारे शिंका येतात, नाक गळते त्याच प्रकारचा त्रास नागरिकांना होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उष्मा सुरू होतो, तेव्हा ताप येण्याचे प्रमाण वाढते. यासोबतच काही रुग्णांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून येत आहेत.बालरुग्णांमध्ये वाढलहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांना वातावरणातील बदलांचा सर्वाधिक फटका बसत आहे. सर्वोपचार रुग्णालयातील लहान मुलांचा वॉर्ड हाउसफुल्ल झाला आहे. लहान मुलांमध्ये सर्दी, ताप आणि खोकल्याचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.अशी करा प्रतिबंधात्मक उपाययोजना

  • सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा.
  • खोकलताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करा.
  • मास्कचा वापर करावा.
  • हात वारंवार साबणाने धुवा.
  • भरपूर पाणी प्या, संतुलित आहार घ्या.

वातावरणातील बदलांमुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रणासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. नागरिकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी संतुलित आहार व नियमित व्यायाम केल्यास विविध आजारांपासून बचाव करता येईल.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य