शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

खरिपात पीक पॅटर्न बदलवा- एकनाथ डवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 14:50 IST

अकोला: बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी यावर्षीही कृषी विभाग, विद्यापीठाला दक्ष राहावे लागणार असून, यासाठी पीक पॅटर्न बदलविण्यासाठीची जबाबदारी कृषी विभागाने स्वीकारावी, असे आवाहन राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी मंगळवारी केले.

अकोला: बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी यावर्षीही कृषी विभाग, विद्यापीठाला दक्ष राहावे लागणार असून, यासाठी पीक पॅटर्न बदलविण्यासाठीची जबाबदारी कृषी विभागाने स्वीकारावी, असे आवाहन राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी मंगळवारी केले.बीटी कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व मक्यावरील नवीन लष्करी अळी व्यवस्थापन मोहीम-२०१९ अंतर्गत कृषी अधिकारी, शास्त्रज्ञांसाठी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमिटी सभागृहात विदर्भस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डवले बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते, तर महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. विजय वाघमारे, अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, नागपूर विभागीय सहसंचालक रवींद्र भोसले, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.डवले म्हणाले, बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आपण यशस्वी ठरलो; पण आता गाफील राहून चालणार नाही. तसेच नवीन अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान आपणासमोर आहे. बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी सर्व उपाययोजना करा, फरदडीचा कापूस घेऊ नका, कामगंध सापळे वापर वाढवा, शेतकऱ्यांना यथोचित मार्गदर्शन करा, असे आवाहन करताना यावर्षीदेखील सावधगिरीचा उपाय म्हणून कापसाचे बियाणे मे महिन्यानंतरच बाजारात पाठवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्व हंगामी कापसाची पेरणी शेतकऱ्यांनी टाळावी, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. भाले यांनी यावर्षीही बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठीचे नियोजन करण्यासाठी ही कार्यशाळा बोलाविण्यात आल्याचे सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठFarmerशेतकरी