शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
4
ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
5
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
6
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
7
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
8
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती
10
भविष्यातील भारतात अदानी ग्रुपचं काय योगदान असेल?; प्रणव अदानींनी सांगितला संपूर्ण 'प्लॅन'
11
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
12
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
13
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
14
मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना आता हक्काचे घर; ‘मदत माश’ जमिनीवरील घरे नियमित होणार
15
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
16
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
17
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
18
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
19
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
20
Shivraj Patil Death: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार औटघटकेचं; तुम्ही कामाला लागा! उध्दवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचे आवाहन

By आशीष गावंडे | Updated: June 20, 2024 22:39 IST

लाेकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उध्दवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या चाचपणीला प्रारंभ केला असून गुरुवारी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत अकाेल्यात दाखल झाले हाेते.

अकाेला: लाेकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने भाजपला जमिनीवर आणले आहे. २८ जागांवर लढणाऱ्या भाजपला अवघ्या नऊ जागांवर गुंडाळून ठेवले. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात असलेली चीड मतांमध्ये रूपांतरित केली. परिणामी मोदी सरकारला सत्ता स्थापन करताना नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांची साथ घ्यावी लागली. या दाेन्ही नेत्यांचा पूर्वइतिहास तपासल्यास ते कधी पलटी मारतील,याचा भरवसा नसल्यामुळे केंद्र सरकार औटघटकेचं असून तुम्ही विधानसभेच्या कामाला लागण्याचे आवाहन उध्दवसेनेचे खासदार तथा विदर्भाचे संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांनी शिवसैनिकांना केले. 

लाेकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उध्दवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या चाचपणीला प्रारंभ केला असून गुरुवारी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत अकाेल्यात दाखल झाले हाेते. आढावा बैठकीनंतर पदाधिकारी व शिवसैनिकांना खा.सावंत यांनी मार्गदर्शन केले. आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच विधानसभा निवडणूक लढणार आहाेत. पुढील तीन महिन्यांनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन हाेणार असल्याने तुम्ही जाेमाने कामाला लागा,असे आवाहन खा.सावंत यांनी केले. यावेळी मंचावर जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर, वाशिम संपर्क प्रमुख दिलीप जाधव, सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड, जिल्हाप्रमुख आमदार नितिन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, प्रा.नरेंद्र खेडेकर,माजी आ.संजय गावंडे, हरिदास भदे, अतुल पवनीकर, राजेश मिश्रा, राहुल कराळे आदींची उपस्थिती होती. हाेय, मुस्लिमांनी मते दिली!जनतेने भाजपला बाजूला सारत महाविकास आघाडीला काैल दिल्याचे सांगत खा.अरविंद सावंत यांनी आघाडी व सेनेच्या उमेदवारांना मुस्लिमांनी मतदान केल्याचे स्पष्ट केले. हे आम्ही कधीच नाकारणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.संघटनात्मक बांधणीवर भरभाजपला हद्दपार करण्यासाठी निष्ठावान शिवसैनिकांनी झटले पाहिजे. यासाठी पुढील दिवसांत संघटन बांधणीवर भर देणार असल्याचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले. जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा लढणार असल्याचा निर्धार आ.देशमुख यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Arvind Sawantअरविंद सावंतShiv Senaशिवसेना