शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

राज्याबाहेरील जनावरांचा काफिला महाराष्ट्रात; दुष्काळात तेरावा महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 14:12 IST

 अकोट : राज्याबाहेरील जनावरांचा काफिला मोठ्या प्रमाणावर चराईकरिता महाराष्ट्रात  येत आहे. त्यामुळे येथील पाळीव जनावरे तसेच वन्य प्राण्यांनाही रोगराईची बाधा होण्याची शक्यता पाहता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थान आदी राज्यातून मोठ्या प्रमाणावर काठेवाडी व तत्सम दुग्धव्यावसायिकांची पाळीव जनावरे चराईकरिता येत आहेत. तोंडखुरी /पायखुरी व पशुमारीसारख्या रोगराईची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता दुष्काळात तेरावा महिना आला असल्याची गंभीर समस्या आत्महत्येस प्रवृत्त करणारी ठरत आहे.

- विजय शिंदे

 अकोट : राज्याबाहेरील जनावरांचा काफिला मोठ्या प्रमाणावर चराईकरिता महाराष्ट्रात  येत आहे. त्यामुळे येथील पाळीव जनावरे तसेच वन्य प्राण्यांनाही रोगराईची बाधा होण्याची शक्यता पाहता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. शिवाय सद्यस्थितीत असलेल्या जनावरांची तपासणी करून त्यांना मूळ प्रदेशात जाण्याकरिता प्रवृत्त करावे अन्यथा कठोर कारवाई करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात येत असल्याचे शासनाचे आदेश आहेत; परंतु महाराष्ट्रात  इतर राज्यातील जनावरांच्या कळपांनी बेकादेशीरपणे शिरकाव केला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांकरिता दुष्काळात तेरावा महिना ठरत असल्याची धक्कादायक परिस्थिती आहे.महाराष्ट्रात  गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थान आदी राज्यातून मोठ्या प्रमाणावर काठेवाडी व तत्सम दुग्धव्यावसायिकांची पाळीव जनावरे चराईकरिता येत आहेत. विशेष म्हणजे मध्यप्रदेश व गुजरातमधून प्रचलित प्रवेश मार्गाने येणाऱ्या जनावरांचे प्रमाण जास्त आहे. या जनावरांमुळे पाळीव जनावरे व अभयारण्याच्या क्षेत्रात असणाºया वन्य प्राण्यांमध्ये तोंडखुरी /पायखुरी व पशुमारीसारख्या रोगराईची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत राज्यात परप्रांतामधून मोठ्या प्रमाणात जनावरे येत असल्याचे राज्य महामार्गासह इतर मार्गावर आढळून येत आहेत. शेतातील हंगामाची उलंगवाडी झाल्याने शेते चराईकरिता ही जनावरे आली आहेत. यावरून राज्यात प्रवेशावेळी कोणी कायदेशीर अटकाव केल्याचे दिसून येत नाही. सातपुड्याच्या पायथ्याशी जनावरे आढळून येत आहेत. त्यामुळे बेकायदेशीरपणे प्रवेश करण्यामागे जबाबदारी असलेल्या संबंधिताची मिलीभगत असल्याची शंका व्यक्त होत आहे. सध्या महाराष्ट्रात विशेषत: विदर्भात दुष्काळी परिस्थिती आहे. जनावरांना मुबलक चारा नसल्याने शेतकरी जनावरे विकत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा परराज्यात चारा पाठविण्यावर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत शासन आदेशाची पूर्तता होत नसल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता दुष्काळात तेरावा महिना आला असल्याची गंभीर समस्या आत्महत्येस प्रवृत्त करणारी ठरत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटMelghatमेळघाट