शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

राज्याबाहेरील जनावरांचा काफिला महाराष्ट्रात; दुष्काळात तेरावा महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 14:12 IST

 अकोट : राज्याबाहेरील जनावरांचा काफिला मोठ्या प्रमाणावर चराईकरिता महाराष्ट्रात  येत आहे. त्यामुळे येथील पाळीव जनावरे तसेच वन्य प्राण्यांनाही रोगराईची बाधा होण्याची शक्यता पाहता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थान आदी राज्यातून मोठ्या प्रमाणावर काठेवाडी व तत्सम दुग्धव्यावसायिकांची पाळीव जनावरे चराईकरिता येत आहेत. तोंडखुरी /पायखुरी व पशुमारीसारख्या रोगराईची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता दुष्काळात तेरावा महिना आला असल्याची गंभीर समस्या आत्महत्येस प्रवृत्त करणारी ठरत आहे.

- विजय शिंदे

 अकोट : राज्याबाहेरील जनावरांचा काफिला मोठ्या प्रमाणावर चराईकरिता महाराष्ट्रात  येत आहे. त्यामुळे येथील पाळीव जनावरे तसेच वन्य प्राण्यांनाही रोगराईची बाधा होण्याची शक्यता पाहता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. शिवाय सद्यस्थितीत असलेल्या जनावरांची तपासणी करून त्यांना मूळ प्रदेशात जाण्याकरिता प्रवृत्त करावे अन्यथा कठोर कारवाई करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात येत असल्याचे शासनाचे आदेश आहेत; परंतु महाराष्ट्रात  इतर राज्यातील जनावरांच्या कळपांनी बेकादेशीरपणे शिरकाव केला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांकरिता दुष्काळात तेरावा महिना ठरत असल्याची धक्कादायक परिस्थिती आहे.महाराष्ट्रात  गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थान आदी राज्यातून मोठ्या प्रमाणावर काठेवाडी व तत्सम दुग्धव्यावसायिकांची पाळीव जनावरे चराईकरिता येत आहेत. विशेष म्हणजे मध्यप्रदेश व गुजरातमधून प्रचलित प्रवेश मार्गाने येणाऱ्या जनावरांचे प्रमाण जास्त आहे. या जनावरांमुळे पाळीव जनावरे व अभयारण्याच्या क्षेत्रात असणाºया वन्य प्राण्यांमध्ये तोंडखुरी /पायखुरी व पशुमारीसारख्या रोगराईची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत राज्यात परप्रांतामधून मोठ्या प्रमाणात जनावरे येत असल्याचे राज्य महामार्गासह इतर मार्गावर आढळून येत आहेत. शेतातील हंगामाची उलंगवाडी झाल्याने शेते चराईकरिता ही जनावरे आली आहेत. यावरून राज्यात प्रवेशावेळी कोणी कायदेशीर अटकाव केल्याचे दिसून येत नाही. सातपुड्याच्या पायथ्याशी जनावरे आढळून येत आहेत. त्यामुळे बेकायदेशीरपणे प्रवेश करण्यामागे जबाबदारी असलेल्या संबंधिताची मिलीभगत असल्याची शंका व्यक्त होत आहे. सध्या महाराष्ट्रात विशेषत: विदर्भात दुष्काळी परिस्थिती आहे. जनावरांना मुबलक चारा नसल्याने शेतकरी जनावरे विकत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा परराज्यात चारा पाठविण्यावर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत शासन आदेशाची पूर्तता होत नसल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता दुष्काळात तेरावा महिना आला असल्याची गंभीर समस्या आत्महत्येस प्रवृत्त करणारी ठरत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटMelghatमेळघाट