शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मालवाहूची वाहनाची ऑटोरिक्षाला धडक; चिमुकली ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 18:18 IST

Murtijapur Accident :  या अपघातात अंकिता गणेश गायकवाड (६ वर्षे ) ही चिमुकली घटनास्थळीच ठार झाली

मूर्तिजापूर : येथून काही अंतरावर असलेल्या व ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो फाट्या नजीक मीनी मालवाहू व अॉटो रिक्षात झालेल्या धडकेत ६ वर्षाची चिमुकली घटनास्थळीच ठार झाली तर अॉटोत असलेल्या १० प्रवाशांपैकी चौघे गंभीर जखमी झाले, सदर घटना २० नोव्हेंबर रोजी दुपारी ३:३० वाजताच्या दरम्यान घडली.

        अॉटोतील सर्व प्रवासी दसरा मैदान अमरावती येथील रहिवासी असून ते अॉटोने हातगाव येथील लग्नसमारंभात आले होते. राष्ट्रीय महामार्ग अत्यंत खराब असल्याने लग्नसमारंभ आटोपून एमएच २७ बीडब्ल्यू ३०४१ या क्रमांकाच्या अॉटो रिक्षाने अमरावतीला दर्यापूर मार्गाने परत जात असताना सिरसो फाट्या नजीक विरुद्ध दिशेने येत असलेल्या एमएच ३० एव्ही ०३७८ क्रमांच्या मीनी मालवाहूने जोरदार धडक दिली. या अपघातात अंकिता गणेश गायकवाड (६ वर्षे ) ही चिमुकली घटनास्थळीच ठार झाली. तर गणेश महादेव गायकवाड (४५), सुधीर खडसे (३४) वत्सला दीपक इंगोले (४५) आणि भारती गाणेश गायकवाड (३५) हे चौघे गंभीर जखमी झाले. इतर प्रवाशीही जखमी झाले आहेत. चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच येथील वंदेमातरम आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी अधिक तपास हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातMurtijapurमुर्तिजापूर