शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

चॉकलेटच्या पाकिटातून गांजाची विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 20:09 IST

गांजाची विक्री करणारा मुख्य सूत्रधार अद्यापही पोलिसांच्या कारवाईपासून दूर आहे.

विजय शिंदे

अकोट: मुंबईत अमली पदार्थाचे रॅकेट उघडकीस येत असताना, अडगाव, बोरव्हा येथे पोलिसांनी छापा घालून तब्बल १४६ किलो गांजा जप्त केला होता. विशेष म्हणजे, गांजाची तस्करी करणारे आरोपी शौकिनांना चॉकलेट पाकिटातून गांजा उपलब्ध करून देत होते, असे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. गांजाची विक्री करणारा मुख्य सूत्रधार अद्यापही पोलिसांच्या कारवाईपासून दूर आहे.सातपुड्याच्या मार्गाचा अवैध व्यवसायाच्या तस्करीसाठी वापर होत आहे. रेल्वे लाइन बंद झाल्यानंतर अवैध व्यावसायिकांनी संग्रामपूर-टुनकी मार्गे विदर्भात अनेक ठिकाणी आपले एजंट नेमून गांजा तस्करीच्या व्यवसायाला बळ दिले. अमली पदार्थ तस्करी होत असल्याची माहिती फुटू नये, यासाठी चॉकलेटच्या पाकिटांच्या वापर करण्यात येत असे. चॉकलेटच्या पाकिटांमध्ये शौकिनांना गांजा पुरविण्यात येत असल्याची माहिती या प्रकरणामुळे समोर आली आहे. शिवाय बाहेरगावी गांजा नियोजित एजंटपर्यंत पोहोचवित असताना पोलिसांना संशय येऊ नये. हाच चॉकलेटच्या पाकिटाचा उद्देश आहे. गांजा तस्करी प्रकरणात अनेक जण गुंतले आहेत. त्यामुळे पोलिसांनी गांजा जप्त प्रकरणाची सखोल चौकशी करून यातील पाळेमुळे शोधून काढण्याची गरज आहे. गांजा साठवणुकीचे मुख्य ठिकाण म्हणून तेल्हारा तालुक्यातील बोरव्हा गावातील शत्रुघ्न भाऊलाल चव्हाण याचे घर होते. या घरातून ५२ पाकिटांमध्ये एकूण १ क्विंटल ४७ किलो गांजा २३ सप्टेंबर रोजी पोलिसांनी जप्त केला. याच बोरव्हा गावातून कैलास बाजीराव पवार (रा. वारी हनुमान, ता. तेल्हारा) याने १८ पाकिटात ३९ किलो गांजा आणला होता. हा गांजा अकोट तालुक्यातील अडगाव खुर्द येथे निंबाच्या झाडाखालील राजू मोतीराम सोळंके याच्या झोपडीत ठेवला होता. पोलिसांनी गांजासह विविध आकाराची चॉकलेटची पाकिटे जप्त केली. गांजा तस्करीचे जाळे बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर-टुनकी गावापर्यंत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

 

टॅग्स :akotअकोटCrime Newsगुन्हेगारी