शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

चाळीस टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी असलेल्या बसफेऱ्या होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 10:06 IST

दैनंदिन आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे, त्यामधून बाहेर येण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती आहे.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाच्या संकटामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस तब्बल तीन महिने बंद असल्याने आर्थिक गर्तेत सापडलेल्या परिवहन महामंडळाने यामधून बाहेर येण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहे. ज्या बसेसच्या फेऱ्या ४० टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी असताना गावात, शहरात धावतात, त्या ठिकाणच्या बसफेऱ्या बंद करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.कोरोनामुळे एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत एसटी बसेस बंद असल्याने तसेच आताही बहुतांश जिल्ह्यात एसटीची चाके थांबलेलीच आहेत.त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते देण्यासही महामंडळाला अडचणी येत असल्याने या आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने विविध खर्च कमी करत एसटीला या तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.महामंडळाने काटकसरीचे धोरण अवलंबत ज्या गावात किंवा शहरात धावणाऱ्या एसटी बसेसमध्ये ४० टक्केपेक्षा कमी प्रवासी आहेत, त्या बसफेऱ्याच रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला सध्या जो दैनंदिन आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे, त्यामधून बाहेर येण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती आहे.४० टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका बसफेरीतून खर्चासोबतच महामंडळालाही आर्थिक हातभार लागणार असल्याची खात्री महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना आहे.

२० पेक्षा अधिक प्रवाशांची गरजकोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी एका एसटी बसमध्ये एका सीटवर एक प्रवासी याप्रमाणे २३ ते २५ प्रवासी प्रवास करतील असे निर्देश देण्यात आले आहेत; मात्र काही गावांमध्ये किंवा शहरात एका बसमध्ये केवळ १० ते १२ च प्रवासी प्रवास करीत असल्याने अशा बसफेºयांमुळे महामंडळाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ४० टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी असलेल्या बसफेºयांमुळे तोट्यात येणाºया महामंडळाला वाचविण्यासाठी कमीत कमी २० पेक्षा अधिक प्रवासी असणे गरजेचे असल्याचाही निर्णय महामंडळाने घेतला आहे.डिझेलची दरवाढही मुळावरआधीच कोरोनाच्या संकटाने बंद असलेल्या एसटीची चाके फिरण्यास सुरुवात झाली; मात्र त्यांना आणखी एका अडचणीचा सामना करावा लागला. डिझेलची दरवाढ झाल्यानेही एसटीला आणखी फटका बसत आहे. आधीच कमी प्रवासी संख्येवर एसटी बसेस धावत असताना त्यातच डिझेलची दरवाढ झाल्यानेही एसटी महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportएसटी