शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

बुलडाणा जिल्ह्याची वीज हानी १८ टक्क्यांवर; १५ टक्क्यांवर आणण्याचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:36 IST

बुलडाणा : मोठय़ा प्रमाणावरील वीज गळती आणि वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणने सध्या जिल्ह्यात मोहीम उघडली असून, जिल्ह्याची वीज हानी १८.४८ टक्क्यांवर आली आहे. दोन वर्षाच्या तुलनेत वीज गळतीचे प्रमाण ११.२२ टक्क्याने कमी झाल्याचे दिसून येते. गळती व वीज चोरी रोखण्यासाठी वीज रोहित्रावर लावण्यात आलेल्या मीटरचीही उपयोगिता आता सिद्ध होत आहे.

ठळक मुद्देचोर रोखण्याकरिता जिल्ह्यात धडक कारवाई

ब्रह्मनंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मोठय़ा प्रमाणावरील वीज गळती आणि वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणने सध्या जिल्ह्यात मोहीम उघडली असून, जिल्ह्याची वीज हानी १८.४८ टक्क्यांवर आली आहे. दोन वर्षाच्या तुलनेत वीज गळतीचे प्रमाण ११.२२ टक्क्याने कमी झाल्याचे दिसून येते. गळती व वीज चोरी रोखण्यासाठी वीज रोहित्रावर लावण्यात आलेल्या मीटरचीही उपयोगिता आता सिद्ध होत आहे.महावितरणच्या वितरण व्यवस्थेतील गळती आणि वीजचोरी यामुळे वीज हानी निर्माण होते. प्रत्यक्ष पुरविलेली वीज आणि त्याचा मिळालेला मोबदला यात येणारा फरक, हा महावितरणची हानी समजली जाते. वीज हानी कमी करण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडून आदेश देण्यात आले असून, त्यानुसार महाराष्ट्रभर महावितरणचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. वीज हानी टाळण्याकरीता वीज चोरी रोखणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने राज्यभर महावितरणच्या पथकांतर्गत वीजचोरीच्या विरोधात मोहिमा राबविण्यात येत आहेत. गेल्या दहा महिन्यात जिल्ह्यात वीज हानी टाळण्याच्या दृष्टीने मोठे प्रयत्न झाले असून, जवळपास १ हजार १९९ वीज चोरट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच वीज वितरणातील घट शोधण्यावरही भर देण्यात आला असून, वितरण रोहित्रांना त्याचप्रमाणे फिडरवरही मीटर बसविण्यात आले. गळती कमी करणे आणि वीज चोरी रोखण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबविण्यात आल्याने  सध्या जिल्ह्याची वीज हानी १८.४८ टक्क्यावर आली आहे. त्यामध्ये खामगाव विभागांतर्गत २१.0२ टक्के,   मलकापूर १५.७६ टक्के आणि बुलडाणा १७.३0 टक्क्यावर वीज हानी आहे. ऑक्टोबर २0१५ ते मार्च २0१६ मध्ये जिल्ह्याची    २९.७ टक्क्यांवर होती. ती आता १८.४८ टक्क्यावर आली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ११.२२ टक्क्याने वीज गळती कमी झाली आहे. 

वीज चोरट्यांकडून पावणे दोन कोटी वसूलवीज गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी वीज हानी रोखण्यावर भर दिला. जिल्ह्यात वीज चोरट्यांवर धडक कारवाई करून गेल्या दहा महिन्यात १ हजार १९९ वीज चोरट्यांकडून १ कोटी ७३ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच १८, १९ व २0 जानेवारी या तीन दिवसांच्या कालावधीतसुद्धा जिल्ह्यात वीज चोरट्यांविरूद्ध धडक कारवाईची मोहीम राबविण्यता आली होती. यामध्ये तीन दिवसात ५१५ वीज चोरट्यांवर करवाई करण्यात आली. 

गळती मार्चपर्यंत १५ टक्क्यांवरवीज गळती सध्या १८.४८ टक्क्यावर आली असून, वीज गळतीचे हे  प्रमाण मार्चपर्यंत १५ टक्क्यांवर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालवले आहे. त्यासाठी महावितरणचे विशेष पथकही प्रत्येक भागात काम करत असून, दोन महिन्यात वीज गळतीचे प्रमाण आणखी कमी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विजेचा पुरवठा करताना होणारी गळती आणि चोरी रोखण्यावर सध्या भर दिला जात आहे. त्यासाठी वीज गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी नियमित वीज बिल भरणार्‍या ग्राहकांचाही महत्त्वाचा वाटा असतो. जिल्ह्याची वीज हानीची टक्केवारी १८.४८ असून, दोन महिन्यात  आणखी वीज हानी कमी होईल.              - गुलाबराव कडाळे, अधीक्षक अभियंता,महावितरण कंपनी, बुलडाणा

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण