शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

बुलडाणा जिल्ह्यातील १५४ शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे अर्ज धुळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 18:23 IST

बुलडाणा: सिंचनक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणारी कृषी पंप वाटपाची योजना गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने जिल्ह्यातील १५४ शेतकºयांचे अर्ज महावितरणकडे पडून आहेत.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: सिंचनक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणारी कृषी पंप वाटपाची योजना गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने जिल्ह्यातील १५४ शेतकºयांचे अर्ज महावितरणकडे पडून आहेत. परंतू आता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार असून त्यात पेंडिंगमधील शेतकºयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कृषी पंपाची प्रतीक्षा असलेल्या शेतकºयांच्या आशा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेमुळे पल्लवीत झाल्या आहेत. मुबलक पाणी असूनही अनेक शेतकरी केवळ कृषी पंप नसल्यामुळे शेतीला पाणी देऊ शकत नाहीत. त्यात विद्युत भारनियम असेल तर पुन्हा अडचणी. दिवसभर विद्युत गुल राहत असल्याने रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा होतो. अशावेळेस अनेक शेतकरी रात्रीला शेतात जाऊन पिकांना पाणी देतात. त्यावर शेतकºयांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे, त्यामाध्यमातून सिंचनाखालील क्षेत्र वाढावे, यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे. ८ डिसेंबर २०१७ पासून कृषी पंप वापटपाची योजना बंद होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना महावितरणकडून मिळणाºया कृषी पंपाचा लाभ घेता आला नाही. दरम्यानच्या काळात महावितरणकडे जिल्ह्यातील १५४ शेतकºयांचे अर्ज आले आहेत. परंतू योजनाच बंद पडल्याने शेतकºयांना कृषी पंपाच्या प्रतीक्षेतच रहावे लागले. परंतू आता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्याचा निर्णय १६ आॅक्टोबर रोजी मंत्रिमंडाळात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत पुढील तीन वर्षात राज्यात एक लाख पंप बसविण्यात येणार असून त्यातील २५ हजार पंप यंदाच्या आर्थिक वर्षात देण्यात येणार आहेत. कृषी पंप वितरणात पेंडिंगमधील शेतकºयांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यांनी भरलेली अनामत रक्कम शेतकºयांच्या हिश्शात समायोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महावितरण कार्यालयाकडे कृषी पंपासाठी आलेल्या १५४ शेतकºयांच्या अर्जावर विचार होणार असल्याचे प्रथमदर्शनी जाणवत आहे. यासंदर्भात महावितरणचे अधिक्षक अभियंता कडाळे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती