शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

उत्पादन बंद असताना वीटभट्ट्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 14:23 IST

अकोला : राष्ट्रीय, राज्य महामार्ग, गावे, वस्त्यालगत सुरू असलेल्या वीटभट्ट्यामुळे प्रदूषणात होत असलेली वाढ रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करण्याला बगल देण्याचा प्रकार केला आहे.

ठळक मुद्देठरलेल्या उत्पादन मर्यादेत विटांची निर्मितीच होत नसल्याचा अहवाल तयार करण्याचा घाट घातला जात आहे.विशेष म्हणजे, महसूल विभागाने एप्रिल २०१८ मध्येच वीटभट्ट्यांचा अहवाल मंडळाकडे दिला होता.

अकोला : राष्ट्रीय, राज्य महामार्ग, गावे, वस्त्यालगत सुरू असलेल्या वीटभट्ट्यामुळे प्रदूषणात होत असलेली वाढ रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करण्याला बगल देण्याचा प्रकार केला आहे. पावसाळ््यात विटांचे उत्पादन बंद असताना भट्ट्यांची तपासणी करून तेथे ठरलेल्या उत्पादन मर्यादेत विटांची निर्मितीच होत नसल्याचा अहवाल तयार करण्याचा घाट घातला जात आहे. विशेष म्हणजे, महसूल विभागाने एप्रिल २०१८ मध्येच वीटभट्ट्यांचा अहवाल मंडळाकडे दिला होता.प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील पारंपरिक वीटभट्ट्यांसाठी (स्थान, निश्चिती व उद्योग उभारणी) नियम २०१६ प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार या वीटभट्ट्या कोणत्या ठिकाणी असू नयेत, याबाबत विविध ठिकाणे, रस्ते, गावांपासूनचे अंतरही निश्चित केले आहे. या नियमांचा भंग करणाऱ्या वीटभट्ट्यांवर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहेत. त्यासाठी कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या संपूर्ण वीटभट्ट्यांची माहिती महसूल विभागाच्या अधिकाºयांकडून घ्यावी, त्या वीटभट्ट्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तपासणी करावी, त्यानंतर कारवाई करावी, असे निर्देश सातत्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे हवा प्रदूषण नियंत्रण विभागाचे सहसंचालक डॉ. वि.मो. मोटघरे यांनी दिले. तसेच त्याबाबतच्या कारवाईचा अहवालही राज्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाºयांकडून मागवला. तोही सादर केला जात नसल्याची माहिती आहे.- आधी महसूल विभागावर खापरप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिनियमानुसार कारवाई करण्यासाठी महसूल विभागाकडून वीटभट्टी व्यावसायिकांची यादीच दिली जात नाही, असा पाढा प्रादेशिक अधिकारी कार्यालयांनी वाचला. त्यामुळे कारवाईच करता येत नाही, असेही वरिष्ठ कार्यालयाला कळवले. अकोला जिल्ह्यातील वीटभट्ट्यांची यादी मिळाल्यानंतर काहींना केवळ नोटीस बजावण्यात आल्या. त्यापुढे प्रदूषण नियंत्रण मंडळाने काहीच केले नसल्याची माहिती आहे.- कारवाई टाळण्यासाठी पावसाळ््यात मोहीमजिल्ह्यातील वीटभट्ट्यांमध्ये विटांची निर्मिती पावसाळा सुरू होताच बंद केली जाते. आधी उत्पादित विटांची विक्री केली जाते. भट्ट्यावर असलेल्या साठ्यात सतत घट होते. त्यामुळे या काळात भट्ट्यांची पाहणी केली असता अधिनियमातील तरतुदीपेक्षा कमी क्षमतेची निर्मिती असल्याने कारवाई करता येत नाही, असा पवित्रा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेतला जात असल्याची माहिती आहे.- अहवालात विटांच्या निर्मितीमध्ये तफावतछोट्या वीटभट्टीवर एका भट्टीतून ४० हजार विटांची निर्मिती केली जाते. त्यासाठी ४० ब्रास माती एका आठवड्यात लागते. महिन्याला १६० ते २०० ब्रास माती या भट्टीवर लागते. नोव्हेंबर ते जून या आठ महिन्यांच्या काळात १२०० ते १४०० ब्रास मातीचा वापर त्या वीटभट्टी मालकाकडून केला जातो. आठवडाभरात एका भट्टीवर लाखापेक्षाही अधिक विटा तयार केल्या जातात, असे असताना तेथे ५० हजारांपेक्षा कमी विटांची निर्मिती केली जाते, असा अहवाल प्रदूषण मंडळाकडून तयार केला जात आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाpollutionप्रदूषण