शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

कडक निर्बंधात वैवाहिक जीवनातील कलहाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 10:49 IST

Akola News : किरकाेळ कारणावरून वाद झालेल्या एकूण १३० प्रकरणात महिला सुरक्षा कक्षाच्यावतीने त्यांचा समेट घडवून आणला.

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : लाॅकडाऊन काळात संपूर्ण कुटुंबच घरामध्ये अडकल्याने दैनंदिन आयुष्याचे गणित बिघडले. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. रोजगाराचे साधन हिरावले गेले. या आरोग्य, आर्थिक चिंतेच्या कठीण काळात महिलांवर अत्याचार झाले. कोरोना विषाणू संसर्गाचे संकट पाहता २०२० मधील लाॅकडाऊनमध्ये वैवाहिक जीवनात माेठ्या प्रमाणात पती-पत्नींमध्ये कलह हाेऊन तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या, त्या २०२१ मधील कडक निर्बंधामध्ये काही अंशी कमी झाल्याचे भरोसा सेलकडे प्राप्त तक्रारीवरून समोर आले आहे.

जिल्ह्यात वाढता काेराेना संसर्ग पाहता २०२० मध्ये लाॅकडाऊन लावण्यात आले, त्यानंतर जून महिन्यात अनलाॅक करण्यात आले. २०२० मध्ये एकूण् ३१२ तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या. यापैकी १११ प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता, तर १०३ प्रकरणात समेट घडवून आणण्यात आला हाेता. ३२ प्रकरणात परस्पर घटस्फोट तर १५ प्रकरणे जिल्हा वर्ग, ५१ प्रकरणे पाेलीस ठाण्याला परत पाठविण्यात आली. २०२१च्या जानेवारी ते ३१ मे अखेरपर्यंत एकूण १२७ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १२७ प्रकरणात समेट घडविण्यास यश आले. ३६ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून, ६४ प्रकरणे प्रलंबित आहेत.

 

१३० पती-पत्नींचे भांडण सोडविले

हाताला काम नाही यामुळे निर्माण झालेल्या घरातील चिडचिड्या वातावरणामुळे किरकाेळ कारणावरून वाद झालेल्या एकूण १३० प्रकरणात महिला सुरक्षा कक्षाच्यावतीने त्यांचा समेट घडवून आणला. आज ही कुटुंबे व्यवस्थित जीवन जगताना दिसून येत आहेत. यामध्ये २०२० मधील १०३ तर चालूवर्षातील २७ भाडणांचा समावेश आहे.

 

 

वादाचे मुख्य कारण मद्यप्राशन

लाॅकडाऊनमध्ये व कडक निर्बंधात बऱ्याचवेळी दारूची दुकाने बंद असताना सुद्धा सर्वाधिक तक्रारी दारू पिऊन वाद घालणे व पत्नीस मारहाण केल्याच्या आहेत. तसेच माेबाईलवर संभाषण करीत पत्नी राहते याच्याही काही तक्रारी असून, घरगुती वादाची प्रकरणे आहेत.

 

 

पतीच्या प्रेमसंबंधामुळे कुटुंबात कलह

अकोट तालुक्यातील एका गावातील व्यक्तीचे लग्न झाल्यानंतरही प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून नेहमीच कुटुंबात कलह निर्माण व्हायचा. यासंदर्भात २०२० मध्ये तक्रार दाखल करण्यात आली हाेती.

 

 

गत २०२० व २०२१ मध्ये एकूण महिला अत्याचाराच्या ४३९ तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या. यापैकी २४१ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. चालू वर्षातील प्रलंबित असलेली प्रकरणे साेडविण्यात येणार आहेत.

- संजीव राऊत

प्रमुख भरोसा सेल

टॅग्स :AkolaअकोलाFamilyपरिवार