शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
4
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
5
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
6
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
7
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
8
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
9
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
10
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
11
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
12
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
13
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
14
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
15
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
16
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
17
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
18
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
19
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
20
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!

कडक निर्बंधात वैवाहिक जीवनातील कलहाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 10:49 IST

Akola News : किरकाेळ कारणावरून वाद झालेल्या एकूण १३० प्रकरणात महिला सुरक्षा कक्षाच्यावतीने त्यांचा समेट घडवून आणला.

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : लाॅकडाऊन काळात संपूर्ण कुटुंबच घरामध्ये अडकल्याने दैनंदिन आयुष्याचे गणित बिघडले. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. रोजगाराचे साधन हिरावले गेले. या आरोग्य, आर्थिक चिंतेच्या कठीण काळात महिलांवर अत्याचार झाले. कोरोना विषाणू संसर्गाचे संकट पाहता २०२० मधील लाॅकडाऊनमध्ये वैवाहिक जीवनात माेठ्या प्रमाणात पती-पत्नींमध्ये कलह हाेऊन तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या, त्या २०२१ मधील कडक निर्बंधामध्ये काही अंशी कमी झाल्याचे भरोसा सेलकडे प्राप्त तक्रारीवरून समोर आले आहे.

जिल्ह्यात वाढता काेराेना संसर्ग पाहता २०२० मध्ये लाॅकडाऊन लावण्यात आले, त्यानंतर जून महिन्यात अनलाॅक करण्यात आले. २०२० मध्ये एकूण् ३१२ तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या. यापैकी १११ प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता, तर १०३ प्रकरणात समेट घडवून आणण्यात आला हाेता. ३२ प्रकरणात परस्पर घटस्फोट तर १५ प्रकरणे जिल्हा वर्ग, ५१ प्रकरणे पाेलीस ठाण्याला परत पाठविण्यात आली. २०२१च्या जानेवारी ते ३१ मे अखेरपर्यंत एकूण १२७ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १२७ प्रकरणात समेट घडविण्यास यश आले. ३६ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून, ६४ प्रकरणे प्रलंबित आहेत.

 

१३० पती-पत्नींचे भांडण सोडविले

हाताला काम नाही यामुळे निर्माण झालेल्या घरातील चिडचिड्या वातावरणामुळे किरकाेळ कारणावरून वाद झालेल्या एकूण १३० प्रकरणात महिला सुरक्षा कक्षाच्यावतीने त्यांचा समेट घडवून आणला. आज ही कुटुंबे व्यवस्थित जीवन जगताना दिसून येत आहेत. यामध्ये २०२० मधील १०३ तर चालूवर्षातील २७ भाडणांचा समावेश आहे.

 

 

वादाचे मुख्य कारण मद्यप्राशन

लाॅकडाऊनमध्ये व कडक निर्बंधात बऱ्याचवेळी दारूची दुकाने बंद असताना सुद्धा सर्वाधिक तक्रारी दारू पिऊन वाद घालणे व पत्नीस मारहाण केल्याच्या आहेत. तसेच माेबाईलवर संभाषण करीत पत्नी राहते याच्याही काही तक्रारी असून, घरगुती वादाची प्रकरणे आहेत.

 

 

पतीच्या प्रेमसंबंधामुळे कुटुंबात कलह

अकोट तालुक्यातील एका गावातील व्यक्तीचे लग्न झाल्यानंतरही प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून नेहमीच कुटुंबात कलह निर्माण व्हायचा. यासंदर्भात २०२० मध्ये तक्रार दाखल करण्यात आली हाेती.

 

 

गत २०२० व २०२१ मध्ये एकूण महिला अत्याचाराच्या ४३९ तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या. यापैकी २४१ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. चालू वर्षातील प्रलंबित असलेली प्रकरणे साेडविण्यात येणार आहेत.

- संजीव राऊत

प्रमुख भरोसा सेल

टॅग्स :AkolaअकोलाFamilyपरिवार