शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

दलित वस्तीतील सौरदिव्याखाली अंधार!

By admin | Updated: January 26, 2017 10:33 IST

पथदिवे केवळ शोभेची वस्तू; दिवे लावल्यापासूनच बंद स्थितीत.

अकोला, दि. २५-जिल्ह्यातील अनेक दलित वस्तीमध्ये लावण्यात आलेले सौर पथदिवे केवळ शोभेची वस्तू ठरत आहेत. काही गावांमध्ये तर दिवे लावल्यापासूनच बंद असल्याची माहिती असून, त्याकडे जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभागाचे दुर्लक्ष आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने प्रत्येक गावात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्तीचा विकास या योजनेंतर्गत सौर पथदिवे लावण्यात आले आहेत. ते पथदिवे लावल्यानंतर त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित पुरवठादाराची आहे. मात्र, बंद पथदिव्याच्या तक्रारी केल्यानंतरही त्याची कुठलीच दखल घेतली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पथदिवे देखभालीची जबाबदारी एप्रिल २0१४ ते मार्च २0१९ पर्यंत पुरवठादार साळुंखे इंडस्ट्रिज यांची आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच ग्रामपंचायतींमध्ये असलेले सौर पथदिवे बंद पडले आहेत. त्याबाबत ग्रामपंचायतला विचारणा केली असता, योजनेची कोणतीच माहिती उपलब्ध नाही. जिल्हा परिषदेचा पंचायत विभागही अनभिज्ञ आहे. विकासाच्या नावाने टक्केवारी घेऊन देयके मंजूर करणे हाच पायंडा रुढ असल्याचा आरोपही ग्रामस्थ करीत आहेत. पळसो बढे येथील सौर पथदिव्यांची सहा महिन्यांपूर्वी ऑनलाइन पद्धतीने तीनवेळा तक्रार केली. त्यावर माणूस पाठवतो असे सांगितल्यानंतरही माणसाचा पत्ता नाही, त्यामुळे सरकारी पैशाची अशी उधळपट्टी होत असेल, तर त्या योजनाच नको, असे मत पळसो बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य हितेश जामनिक व परमेश्‍वर पवार यांनी व्यक्त केले आहे.