शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

तिरंगी लढतीचा भाजपला फायदा

By admin | Updated: May 18, 2014 00:23 IST

अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या २0 वर्षांत काँग्रेसने कधीच विजय पाहिलेला नाही. आघाडीच्या राजकारणात काँग्रेसने पाठिंबा दिलेला उमेदवार दोन वेळा विजयी झाला होता.

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या २0 वर्षांत काँग्रेसने कधीच विजय पाहिलेला नाही. आघाडीच्या राजकारणात काँग्रेसने पाठिंबा दिलेला उमेदवार दोन वेळा विजयी झाला होता. मात्र, २00४ पासून पुन्हा भाजपने या मतदारसंघावर वर्चस्व मिळविले आहे. २00९ मध्ये भाजपने हा गड राखल्यानंतर २0१४ मध्ये पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली. तिरंगी लढतीत नेहमीच भाजपाला धार्मिक समीकरणाचा फायदा होते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे संजय धोत्रे यांनी मिळविलेला विजय मोदी लाटेचा परिणाम असला तरी धार्मिक समीकरणामुळे भाजपविरोधकांच्या मतांमध्ये झालेले विभाजनही धोत्रे यांच्या विजयाचे प्रमुख कारण ठरले. 

सत्ता आणि खासदाराचे गणित अखेर जुळले!

अकोला लोकसभा मतदारसंघात निवडून आलेला खासदार आणि केंद्रातील सत्ता हे गणित १९८९ नंतर प्रथमच जुळले आहे. यापूर्वी भाऊसाहेब फुंडकर दोन वेळा निवडून आले, त्यावेळी केंद्रात भाजपविरोधी सरकार आले होते. १९९६ मध्ये पुंडकर विजयी झाले. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी सरकार १३ दिवसांमध्ये कोसळले होते. पुढे १९९८ आणि १९९९ मध्ये अँड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळविला, तेव्हा काँग्रेसविरोधी पक्षाची सत्ता आली. त्यानंतर २00४ आणि २00९ मध्ये संजय धोत्रे यांनी विजय मिळविला. त्यावेळीसुद्धा केंद्रात भाजपविरोधी पक्षाची सत्ता आली. यावेळी प्रथमच अकोला लोकसभा मतदारसंघात निवडून आलेल्या खासदारांच्या पक्षाची दिल्लीत सत्ता आली आहे. मिळविला होता. त्यानंतर काँग्रेस आणि अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघामध्ये आघाडी झाल्यानंतर दोन वेळा भाजपला या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. काँग्रेस आणि भारिप यांना एकमेकांशिवाय पर्याय नाही, हे २00४ आणि २00९ च्या निवडणुकीत सिद्ध झाले होते. असे असतानाही भारिप आणि काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला त्यादिवशीच भाजपचा विजय निश्‍चित झाला होता. त्यातही काँग्रेसने अल्पसंख्याक समाजातील हिदायत पटेल यांना उमेदवारी दिल्याने आंबेडकर यांच्या मार्गात आणखी एका अडथळ्य़ाची भर पडली. सहकारक्षेत्राबाहेर कोणतीही वेगळी ओळख नसलेल्या हिदायत पटेल यांच्या पाठीशी अल्पसंख्याक समाज ताकदीने उभा राहिला तर आंबेडकर यांना दलितेतर मतांची मोट बांधण्यात अपयश आले. त्यामुळे काँग्रेस आणि भारिप यांच्यात भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊन धोत्रे यांना फायदा होणार, हे आधीच स्पष्ट झाले होते. त्यातच पावणे दोन लाख नवीन मतदार नव्याने जुळले होते. या मतदारांना काँग्रेसच्या परंपरेचे काही घेणे-देणे नसल्याने हा गट मोदी लाटेच्या प्रभावात आला. त्याचा फायदा धोत्रे यांना मिळाल्याने त्यांच्या मताधिक्यात मोठी वाढ झाली. पक्षांतर्गत असंतोष, जनसामान्यांमध्ये न मिसळणारा खासदार आणि अकार्यक्षम असलेले लोकप्रतिनिधी, अशी सर्वसामान्यांमध्ये झालेली भावना, अशा प्रतिकूल परिस्थितीतही धोत्रे यांना मोठय़ा फरकाने मिळालेला विजय हा केवळ मोदी लाट आणि धार्मिक समीकरणं जुळून आल्यामुळेच शक्य झाला.