शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वेगळ्या विदर्भाबाबत भाजपाने भूमिका जाहीर करावी - आ. आशीष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 02:34 IST

मुख्यमंत्र्यांसह भाजपनेच वेगळ्य़ा विदर्भाबद्दलची भूमिका तातडीने जाहीर करावी, शिवसेनेने मोठय़ा मनाने दोन मराठी भाषिक राज्य होत असल्यास पाठिंबा द्यावा, तरीही विरोध असल्यास केंद्रातील भाजपाने बहुमताने विदर्भ राज्याची निर्मिती करायला हवी, असा पुनरुच्चार भाजपाचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी अकोला येथे केला.

ठळक मुद्देशिवसेनेने साथ न दिल्यास बहुमताने निर्णय घ्यावा! 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भाजपाने निवडणुकीतच वेगळ्य़ा विदर्भाच्या मुद्यांवर मते मागितली. त्यावर जनतेने ४४ आमदार निवडून दिले. भाजपच्या सत्तेला तीन वर्ष उलटली तरीही त्याबाबत कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. आता मुख्यमंत्र्यांसह भाजपनेच वेगळ्य़ा विदर्भाबद्दलची भूमिका तातडीने जाहीर करावी, शिवसेनेने मोठय़ा मनाने दोन मराठी भाषिक राज्य होत असल्यास पाठिंबा द्यावा, तरीही विरोध असल्यास केंद्रातील भाजपाने बहुमताने विदर्भ राज्याची निर्मिती करायला हवी, असा पुनरुच्चार भाजपाचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी अकोला येथे केला. शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवणे, बेरोजगारांचे स्थलांतरण थांबवण्यासाठी विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघात ७ ते १३ फेब्रुवारीदरम्यान विदर्भ आत्मबळ यात्रेच्या नियोजनानुसार मुंडगाव येथे बायजाबाई यात्रेनिमित्त त्यांनी भेट देत जनतेशी संवाद साधला. त्यानंतर विश्रामगृहात पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. शेतकर्‍यांना उत्पादन खर्चावर ५0 टक्के नफा देऊन हमीभाव द्यावा, कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देऊन शेतकर्‍यांच्या उत्पादनाला भाव मिळेल, अशी तरतूद येत्या अर्थसंकल्पात करावी, या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास भाजपाचा आमदार राहायचे की नाही, याबाबत सर्व पर्याय खुले आहेत. भाजपने निवडणूक लढताना वेगळ्य़ा विदर्भाचा मुद्दा रेटला होता. आता पुढील निवडणूक तोंडावर असताना भाजपाने वेगळ्य़ा विदर्भाबाबत भूमिका जाहीर करावी, असे डॉ. देशमुख म्हणाले. सत्तेला तीन वर्ष उलटल्यानंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत. रोजगार निर्मिती झाली नाही. त्यामुळे गडचिरोलीसारख्या जिल्हय़ात तरुण नक्षलवादाकडे वळत आहेत. मुख्यमंत्री, कृषिमंत्री, ऊर्जामंत्री विदर्भाचे असताना कोणत्याही क्षेत्रात विकास झाल्याचे उदाहरण नाही. ते काम करीत आहेत; मात्र परिणामकारकता कुठेच नसल्याचेही डॉ. देशमुख म्हणाले. शासकीय यंत्रणेवर सरकारचा वचक नाही, यंत्रणा मुजोर झाली आहे. शासनच्या कामकाजाबद्दल लोकप्रतिनिधींसोबतच लोकांमध्येही रोष आहे, तो आता बाहेर पडत आहे. त्यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. यावेळी रिपाइं (आठवले) महानगर अध्यक्ष गजानन कांबळे उपस्थित होते. 

सरकारकडून विकासाचा केवळ गाजावाजाजो विकास शेवटच्या घटकांपर्यंत पोचत नाही, त्याचा लाभ त्याला मिळत नाही. तोपर्यंत विकास झाला असे म्हणता येत नाही. सरकार भलत्याच मुद्यांवर विकास झाल्याचे सांगत असून शेतकरी, तरूणांना विकासाच्या कोणत्याही उपक्रमाचा लाभ झालेला दिसत नाही त्याचवेळी केवळ विकासाच्या प्रचंड गाजावाजा केला जात आहे. या प्रकाराला विकास म्हणयचे का? असा प्रश्न उपस्थित करून यावर सरकारनेच विचार करावा असा घरचा अहेर आ.देशमुख यांनी सरकारला दिला.  

टॅग्स :akotअकोटAshish Deshmukhआशीष देशमुख