शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

वेगळ्या विदर्भाबाबत भाजपाने भूमिका जाहीर करावी - आ. आशीष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 02:34 IST

मुख्यमंत्र्यांसह भाजपनेच वेगळ्य़ा विदर्भाबद्दलची भूमिका तातडीने जाहीर करावी, शिवसेनेने मोठय़ा मनाने दोन मराठी भाषिक राज्य होत असल्यास पाठिंबा द्यावा, तरीही विरोध असल्यास केंद्रातील भाजपाने बहुमताने विदर्भ राज्याची निर्मिती करायला हवी, असा पुनरुच्चार भाजपाचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी अकोला येथे केला.

ठळक मुद्देशिवसेनेने साथ न दिल्यास बहुमताने निर्णय घ्यावा! 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भाजपाने निवडणुकीतच वेगळ्य़ा विदर्भाच्या मुद्यांवर मते मागितली. त्यावर जनतेने ४४ आमदार निवडून दिले. भाजपच्या सत्तेला तीन वर्ष उलटली तरीही त्याबाबत कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. आता मुख्यमंत्र्यांसह भाजपनेच वेगळ्य़ा विदर्भाबद्दलची भूमिका तातडीने जाहीर करावी, शिवसेनेने मोठय़ा मनाने दोन मराठी भाषिक राज्य होत असल्यास पाठिंबा द्यावा, तरीही विरोध असल्यास केंद्रातील भाजपाने बहुमताने विदर्भ राज्याची निर्मिती करायला हवी, असा पुनरुच्चार भाजपाचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी अकोला येथे केला. शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवणे, बेरोजगारांचे स्थलांतरण थांबवण्यासाठी विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघात ७ ते १३ फेब्रुवारीदरम्यान विदर्भ आत्मबळ यात्रेच्या नियोजनानुसार मुंडगाव येथे बायजाबाई यात्रेनिमित्त त्यांनी भेट देत जनतेशी संवाद साधला. त्यानंतर विश्रामगृहात पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. शेतकर्‍यांना उत्पादन खर्चावर ५0 टक्के नफा देऊन हमीभाव द्यावा, कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देऊन शेतकर्‍यांच्या उत्पादनाला भाव मिळेल, अशी तरतूद येत्या अर्थसंकल्पात करावी, या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास भाजपाचा आमदार राहायचे की नाही, याबाबत सर्व पर्याय खुले आहेत. भाजपने निवडणूक लढताना वेगळ्य़ा विदर्भाचा मुद्दा रेटला होता. आता पुढील निवडणूक तोंडावर असताना भाजपाने वेगळ्य़ा विदर्भाबाबत भूमिका जाहीर करावी, असे डॉ. देशमुख म्हणाले. सत्तेला तीन वर्ष उलटल्यानंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत. रोजगार निर्मिती झाली नाही. त्यामुळे गडचिरोलीसारख्या जिल्हय़ात तरुण नक्षलवादाकडे वळत आहेत. मुख्यमंत्री, कृषिमंत्री, ऊर्जामंत्री विदर्भाचे असताना कोणत्याही क्षेत्रात विकास झाल्याचे उदाहरण नाही. ते काम करीत आहेत; मात्र परिणामकारकता कुठेच नसल्याचेही डॉ. देशमुख म्हणाले. शासकीय यंत्रणेवर सरकारचा वचक नाही, यंत्रणा मुजोर झाली आहे. शासनच्या कामकाजाबद्दल लोकप्रतिनिधींसोबतच लोकांमध्येही रोष आहे, तो आता बाहेर पडत आहे. त्यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. यावेळी रिपाइं (आठवले) महानगर अध्यक्ष गजानन कांबळे उपस्थित होते. 

सरकारकडून विकासाचा केवळ गाजावाजाजो विकास शेवटच्या घटकांपर्यंत पोचत नाही, त्याचा लाभ त्याला मिळत नाही. तोपर्यंत विकास झाला असे म्हणता येत नाही. सरकार भलत्याच मुद्यांवर विकास झाल्याचे सांगत असून शेतकरी, तरूणांना विकासाच्या कोणत्याही उपक्रमाचा लाभ झालेला दिसत नाही त्याचवेळी केवळ विकासाच्या प्रचंड गाजावाजा केला जात आहे. या प्रकाराला विकास म्हणयचे का? असा प्रश्न उपस्थित करून यावर सरकारनेच विचार करावा असा घरचा अहेर आ.देशमुख यांनी सरकारला दिला.  

टॅग्स :akotअकोटAshish Deshmukhआशीष देशमुख