शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

युतीमुळे विधानसभेसाठी इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 13:10 IST

युतीमुळे शिवसेनेच्या वाटेला जिल्ह्यातील किमान दोन विधानसभा मतदारसंघावर पाणी सोडावे लागणार, या विचारातून भाजपमधील इच्छुकांसह सेनेतील अंतर्गत विरोधकांनीही कुटनीतीचा प्रारंभ केल्याचे बोलल्या जात आहे.

- आशिष गावंडेअकोला: केंद्रासह राज्यातील युती सरकारवरील संभाव्य धोका ओळखून एकमेकांवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या भाजप-शिवसेनेचे अचानक मनोमिलन झाले आणि लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांतील इच्छुकांच्या अपेक्षांना धुमारे फुटले. युतीमुळे शिवसेनेच्या वाटेला जिल्ह्यातील किमान दोन विधानसभा मतदारसंघावर पाणी सोडावे लागणार, या विचारातून भाजपमधील इच्छुकांसह सेनेतील अंतर्गत विरोधकांनीही कुटनीतीचा प्रारंभ केल्याचे बोलल्या जात आहे. हा प्रकार पाहता जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेची नेमकी अडचण कोणाला, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.भाजपाने साडेचार वर्षे केलेल्या टिकेचा शिवसेनेने त्यांच्या खास शैलीत समाचार घेऊन आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज होण्याचे फर्मान जारी केले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करून पक्षाची तटबंदी मजबूत केली. याला अकोला जिल्हा अपवाद नाही. सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विधानसभा मतदारसंघात पक्षबांधणीवर जोर दिला. दुसºया बाजूने भाजपनेसुद्धा कार्यकर्त्यांचे जाळे घट्ट विणण्याकडे लक्ष दिले. राजकारणात आणि प्रेमात काहीही होऊ शकते, या उक्तीप्रमाणे भाजप-शिवसेनेने युतीची घोषणा केली. यादरम्यानच्या क ाळात दोन्ही पक्षांतील पदाधिकाºयांनी विधानसभेच्या अपेक्षेने संघटन मजबूत केल्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता पसरणे स्वाभाविक आहे. याचे पडसाद लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाहावयास मिळत आहेत. महायुतीमध्ये सामील प्रमुख मित्रपक्ष शिवसेनेला पद्धतशीरपणे बाजूला सारण्याचे काम भाजपमधून केल्या जात आहे, तर शिवसेनेच्या काही प्रमुख पदाधिकाºयांचे भाजप नेत्यांसोबत असणारे सौहार्दपूर्ण संबंध भाजपसह सेनेतील अनेकांना खटकत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला कोंडीत पकडण्याची खेळी खेळल्या जात आहे, हे तेवढेच खरे.अकोट सोडल्यास पुनर्वसनाचे ‘टेन्शन’२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या ताब्यातील अकोट विधानसभा मतदारसंघ भाजपने मिळविला. सेनेने अकोटसाठी तगादा लावून धरल्यास भाजपसमोर विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पुनर्वसनाचे ‘टेन्शन’ राहील. त्यांच्या तिकिटावर गंडांतर आल्यास दर्यापूर मतदारसंघातील घडामोडी बदलतील, अशी शक्यता आहे. त्यांच्या वयाचा विचार करता पक्ष काय निर्णय घेते, यावरही पुढील समीकरणे अवलंबून राहतील.

मतदारसंघ निसटण्याची धास्तीआज रोजी बाळापूर विधानसभा मतदारसंघांपैकी अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट व मूर्तिजापूर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. शिवसंग्रामच्या खेळीमुळे २०१४ च्या निवडणुकीत बाळापूर मतदारसंघातून भाजपचे तेजराव थोरात यांना पराभवाची चव चाखावी लागली होती. युती झाल्यामुळे थोरात यांच्या अपेक्षेवर पाणी फेरल्या जाण्याची चिन्हे आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना