शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भाजप-शिवसेनेतील शीतयुद्ध शिगेला!

By admin | Updated: October 15, 2015 02:39 IST

जिल्हाध्यक्ष, महापौरांसह स्थानिक पदाधिकार्‍यांना मुंबईत बोलाविले.

अकोला- राज्यात सत्तेत असलेल्या भाजप व शिवसेनेतील शीतयुद्ध शिगेला पोहोचले आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास निर्माण होणार्‍या परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह महापौर आणि स्थानिक पदाधिकार्‍यांना बुधवारी तातडीने मुंबईला बोलाविण्यात आले. शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तारूढ झाल्यापासूनच कोणत्या ना कोणत्या कारणावरून मतभेद झाले आहेत. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभावरून सत्तापक्षांतील मतभेद विकोपाला गेले आहेत. वेळप्रसंगी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा शिवसेनेने दिला असून, त्यापृष्ठभूमिवर मुंबईत बैठकाही सुरू झाल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता राज्यात भाजपला काही धोका आहे का, हे जाणून घेण्यासोबतच संभाव्य परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना बुधवारी तातडीने मुंबईला बोलविण्यात आले. गुरुवारी मुंबईत या सर्व पदाधिकार्‍यांची बैठक होत आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, महापौर उज्ज्वला देशमुख, विजय अग्रवाल आणि काही प्रमुख पदाधिकारी रात्री ९ वाजता विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला रवाना झालेत.

आमदार मुंबईत

जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदार दोन दिवसांपासून मुंबईत आहेत. वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आमदारांना मुंबईत बोलाविण्यात आले होते. शिवसेनेच्या भूमिकेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांना मुंबईतच थांबवून घेण्यात आले. शिवसेनेचे पदाधिकारीही मुंबईला रवाना सत्तेत निर्माण झालेल्या पेचप्रसंगामुळे शिवसेनेतसुद्धा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांना तातडीने मुंबईत बोलाविण्यात आले आहे. माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी बुधवारी मुंबईला रवाना झालेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही बोलाविले!

शिवसेना आणि भाजपमधील मतभेद विकोपाला गेल्यामुळे राज्यात उद्भवणार्‍या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही मुंबईला बोलाविण्यात आले असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील काही नेते बुधवारी मुंबईला रवाना झालेत. यात माजी आमदारांचाही समावेश आहे.