शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

भाजप-शिवसेनेतील शीतयुद्ध शिगेला!

By admin | Updated: October 15, 2015 02:39 IST

जिल्हाध्यक्ष, महापौरांसह स्थानिक पदाधिकार्‍यांना मुंबईत बोलाविले.

अकोला- राज्यात सत्तेत असलेल्या भाजप व शिवसेनेतील शीतयुद्ध शिगेला पोहोचले आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास निर्माण होणार्‍या परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह महापौर आणि स्थानिक पदाधिकार्‍यांना बुधवारी तातडीने मुंबईला बोलाविण्यात आले. शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तारूढ झाल्यापासूनच कोणत्या ना कोणत्या कारणावरून मतभेद झाले आहेत. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभावरून सत्तापक्षांतील मतभेद विकोपाला गेले आहेत. वेळप्रसंगी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा शिवसेनेने दिला असून, त्यापृष्ठभूमिवर मुंबईत बैठकाही सुरू झाल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता राज्यात भाजपला काही धोका आहे का, हे जाणून घेण्यासोबतच संभाव्य परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना बुधवारी तातडीने मुंबईला बोलविण्यात आले. गुरुवारी मुंबईत या सर्व पदाधिकार्‍यांची बैठक होत आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, महापौर उज्ज्वला देशमुख, विजय अग्रवाल आणि काही प्रमुख पदाधिकारी रात्री ९ वाजता विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला रवाना झालेत.

आमदार मुंबईत

जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदार दोन दिवसांपासून मुंबईत आहेत. वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आमदारांना मुंबईत बोलाविण्यात आले होते. शिवसेनेच्या भूमिकेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांना मुंबईतच थांबवून घेण्यात आले. शिवसेनेचे पदाधिकारीही मुंबईला रवाना सत्तेत निर्माण झालेल्या पेचप्रसंगामुळे शिवसेनेतसुद्धा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांना तातडीने मुंबईत बोलाविण्यात आले आहे. माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी बुधवारी मुंबईला रवाना झालेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही बोलाविले!

शिवसेना आणि भाजपमधील मतभेद विकोपाला गेल्यामुळे राज्यात उद्भवणार्‍या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही मुंबईला बोलाविण्यात आले असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील काही नेते बुधवारी मुंबईला रवाना झालेत. यात माजी आमदारांचाही समावेश आहे.