शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

भाजपाच्या तयारीने शिवसेनेत अस्वस्थता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 14:17 IST

भाजपाने २८८ जागांवर लढण्याची तयारी केल्यामुळे शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

ठळक मुद्देअकोल्यात आधीच भाजपाने पाचपैकी चार मतदारसंघ जिंकून सेनेसमोर अडचण उभी केली आहे. भाजपा सर्व जागांचीच तयारी करीत असल्याने युतीधर्मच धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.बाळापूर, अकोट किंवा शहरी भागातील अकोला पश्चिम यापैकी दोन मतदारसंघांचा गुंता आहे.

अकोला: गेली साडेचार वर्षे एकमेकांचे उणेदुणे काढत भाजपा, शिवसेनेने ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करून घवघवीत यश मिळविले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही युती कायम राहील, यात शंका नसतानाच भाजपाने २८८ जागांवर लढण्याची तयारी केल्यामुळे शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अकोल्यात आधीच भाजपाने पाचपैकी चार मतदारसंघ जिंकून सेनेसमोर अडचण उभी केली आहे. त्यातच आता भाजपा सर्व जागांचीच तयारी करीत असल्याने युतीधर्मच धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने ‘अब की बार २२० च्या पार’, असे ध्येय ठेवत २८८ जागांवर तयारी करण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले आहेत. या निर्देशावरून सध्या युतीमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीही भाजपाने स्वबळावर सर्व मतदारसंघ जिंकण्याची रणनीती आखत रणशिंग फुंकले होते; मात्र ऐनवेळी भाजपा, सेना एकत्र आल्याने आता भाजपाला स्वबळाचा नारा सोडून देत युतीधर्म पाळावा लागला. आताही सर्व जागांच्या माध्यमातून स्वबळाचाच नारा दिला आहे. या पृष्ठभूमीवर अकोल्यातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे.अकोल्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी बाळापूर वगळता भाजपाने चार मतदारसंघांत विजय मिळविला आहे. त्यामुळे सेनेला हवे असलेले बाळापूर, अकोट किंवा शहरी भागातील अकोला पश्चिम यापैकी दोन मतदारसंघांचा गुंता आहे. त्यात स्वबळाची भाषा सुरू झाल्याने अनेक इच्छुकांना मात्र संधी दिसत आहे.सध्या शिवसेनाही स्वबळाचीच तयारी करीत आहे. प्रत्येक गावातील प्रत्येक वॉर्डासाठी शाखा सुरू करून बुथनिहाय बांधणी केली जात आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातील एकही गाव यामधून सुटणार नाही, अशी काळजी घेण्याचे निर्देश प्रत्येक तालुका पदाधिकाऱ्यांना दिले असल्याने शिवसेनाही आपले नेटवर्क मजबूत करताना दिसत आहे. दुसरीकडे सर्वच इच्छुक उमेदवारही मतदारसंघात नियमित संपर्क ठेवून आहेत. युती व जागा वाटपासंदर्भातील निर्णय हा वरिष्ठ स्तरावर होईल. तो दोन्ही पक्षाचे पदाधिकारी मान्य करतीलच. प्रत्येक पक्ष आपले नेटवर्क मजबूत करण्याचा प्रयत्न करतो, त्यानुसार आम्हीही प्रत्येक गावात शिवसेनेचे अस्तित्व निर्माण केले असून, बुथ व वॉर्ड हा निकष ठेवून संघटनेची बांधणी करून सज्जता केली आहे.नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख शिवसेना.

 

टॅग्स :PoliticsराजकारणAkolaअकोलाBJPभाजपाShiv Senaशिवसेना