शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सावतराम मिल पुन्हा सुरू करण्यासाठी ध्यानाकर्षण आंदोलन - मदन भरगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 18:18 IST

सावतराम मिल पुन्हा सुरू करण्यासाठी ध्यानाकर्षण आंदोलन येत्या पंधरा दिवसात सुरू करणार आहे, असे मिशन अकोला विकास चळवळीचे प्रणेते माजी महापौर मदन भरगड यांनी सांगितले.

अकोला: देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. अकोल्याला देखील केंद्रीय मंत्री पद मिळाले आहे. म्हणूनच आता अकोलेकरांच्या उपकाराची परतफेड करण्याची संधी भाजपाला मिळाली आहे. अकोल्यात आतापर्यंत भाजपाच सत्तेत होती. मात्र, कोणतेही विकासात्मक कार्य त्यांनी केले नाही. अकोलेकारांच्या उपकाराची त्यांना कदाचित आठवण नसेल, पण त्यांना आठवण करू न देण्याचे कार्य मिशन अकोला विकास करणार आहे. सावतराम मिल पुन्हा सुरू करण्यासाठी ध्यानाकर्षण आंदोलन येत्या पंधरा दिवसात सुरू करणार आहे, असे मिशन अकोला विकास चळवळीचे प्रणेते माजी महापौर मदन भरगड यांनी सांगितले.शहरातील महत्वपुर्ण विषयावर वार्तालाप करण्यासाठी भरगड यांनी बुधवारी पत्रकार परिषद आमंत्रित केली होती. यावेळी त्यांनी शहरातील विविध विषयावर पत्रकारांसोबत चर्चा केली. शहरात बेरोजगारीची समस्या वाढलेली आहे. सुशिक्षित युवक मोठया शहरांकडे धाव घेत आहेत.एमआयडीसीतील उद्योगधंदे डबघाईस आले आहेत. येथील कामगार इतर शहरात रोजगारासाठी स्थलांतर करीत आहेत. येथील बेरोजगारांना आपल्याच शहरात रोजगार मिळावा, यासाठी सावतराम मिल पुन्हा सुरू करण्यात यावी. सावतराम मिलचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी मदन भरगड ध्यानकर्षण आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणार आहेत.

शहरातील महिला बचत गटांना देखील आपल्या  दर्जेदार उत्पादित वस्तुच्या विक्रीची समस्या भेडसावते. या उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही. यासाठी महानगरपालिकेच्या अखत्यारितील भाटे ग्राउंड किंवा राजपुतपुरा येथील मनपाची बंद असलेल्या शाळा क्रमांक २ ची जागा उपलब्ध करू न देण्यात यावी, असे देखील भरगड म्हणाले. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत महापालिेकत आतापर्यंत ६५ हजार अर्ज घरकुलासाठी आले आहेत. परंतू तीन वर्षा त केवळ १५० च्या आसपास घरकुल झाले आहेत. पावसाळा सुरू  झाला तरी देखील हजारो नागरिकांच्या डोक्यावर छत नाही. यासाठी घरकुलांची निर्मिती तीव्रगतीने करावी. शहरातील १ लाख पाच हजार मालमत्ता धारंकाना महापालिकेने अवास्तव कर आकारणी केली आहे. महानगरपालिकेने आकारणी केलेला लुटमार टॅक्स रद््द करण्यात यावा, शासकीय जमिनीवर राहणाºया लाखो नागरिकांना जमिनीचा मालकी हक्क दयावा, गुंठेवारी जमिनीचा ले-आउट नियमित करावा, बी-टेन्युअर जमिनीचा ए-टेन्युअर मध्ये बदल करावा, आदी मागण्यासाठी भरगड आंदोलन करू न सरकारचे लक्ष अकोला शहरासह जिल्हयाचा विकास व्हावा,यासाठी लक्ष वेधणार आहेत. यासर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन विविध माध्यमातुन सुरू  ठेवण्यात येणार असल्याचेही भरगड म्हणाले.

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाMadan Bhargadमदन भरगड