शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारने जनतेची फसवणुक केली - अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 13:32 IST

गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देउन नविन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे सुतोवाच यावेळी अशोक चव्हाण यांनी केले.

अकोट(अकोला) :  केंद्रात व राज्यात भाजप - सेनेचे सरकार आहे. या सरकारने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नाही. जनतेची फसवणूक केली. या सरकारला शेतकरी, युवक, व्यापारी सर्वच कंटाळल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र आणून सत्ता स्थापन करणार, सहा महिन्यानंतर आपलेच सरकार येणार आहे, त्यामुळे आगामी निवडणूकीत अब की बार, बस कर यार ! असा नारा महाराष्टÑ काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला. गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देउन नविन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे सुतोवाच यावेळी अशोक चव्हाण यांनी केले. अकोट येथे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रे दरम्यान स्थानिक खरेदी विक्री मैदानात सभा पार पडली. यावेळी चव्हाण बोलत होते.अशोक चव्हाण यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना मदत तर नाहीच परंतु जीएसटीचा कायदाही शेतकºयांकरिता डोकेदुखी ठरला आहे. व्यापाºयांना वर्षात ३६ रिटर्न भरावे लागत आहेत. राज्यात हे सरकार आल्यापासून ११ हजाराच्या वर शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. तर देशात ५० हजाराच्यावर हा आकडा गेला आहे,असेही चव्हाण यांनी सांगितले.

पंधरा लाख कुठे गेले- विखे पाटीलविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या ठिकाणी भाजपचे पालकमंत्री, आमदार असतांनाही शेगावपासून अकोट या रस्त्याची दुर्दशा पाहता या भागातील रस्त्यांमुळे आजारात वाढ झाली आहे. विकासात वाढ झाल्याचे मात्र कुठे चित्र दिसत नाही. भाजपाने सर्वसामान्य नागरिकांना १५ लाख रुपये प्रत्यकाच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात कोणाच्याही खात्यात एक रुपया आला नाही, उलट नोटांचे रंग बदलले, शेतकºयांना सरसगट कर्जमाफी नाही, विविध प्रकारच्या योजनेचा लाभ नाही. पंधरा लाख कुठे गेले, असा प्रश्नही विखे पाटील यांनी उपस्थित केला. विदेशात पळुन जाणाºया व पैसे बुडविणाºया उद्योजकांना मदत केल्याचा आरोप त्यांनी केला. दुष्काळाकरिता पुरेसा पैसा दिलाच नाही, अशा स्थितीत अकोट तालुकाही दुष्काळग्रस्त घोषीत करायला पाहिजे होता असे सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्राAshok Chavanअशोक चव्हाण