शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

भाजप सरकारने जनतेची फसवणुक केली - अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 13:32 IST

गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देउन नविन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे सुतोवाच यावेळी अशोक चव्हाण यांनी केले.

अकोट(अकोला) :  केंद्रात व राज्यात भाजप - सेनेचे सरकार आहे. या सरकारने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नाही. जनतेची फसवणूक केली. या सरकारला शेतकरी, युवक, व्यापारी सर्वच कंटाळल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र आणून सत्ता स्थापन करणार, सहा महिन्यानंतर आपलेच सरकार येणार आहे, त्यामुळे आगामी निवडणूकीत अब की बार, बस कर यार ! असा नारा महाराष्टÑ काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला. गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देउन नविन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे सुतोवाच यावेळी अशोक चव्हाण यांनी केले. अकोट येथे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रे दरम्यान स्थानिक खरेदी विक्री मैदानात सभा पार पडली. यावेळी चव्हाण बोलत होते.अशोक चव्हाण यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना मदत तर नाहीच परंतु जीएसटीचा कायदाही शेतकºयांकरिता डोकेदुखी ठरला आहे. व्यापाºयांना वर्षात ३६ रिटर्न भरावे लागत आहेत. राज्यात हे सरकार आल्यापासून ११ हजाराच्या वर शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. तर देशात ५० हजाराच्यावर हा आकडा गेला आहे,असेही चव्हाण यांनी सांगितले.

पंधरा लाख कुठे गेले- विखे पाटीलविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या ठिकाणी भाजपचे पालकमंत्री, आमदार असतांनाही शेगावपासून अकोट या रस्त्याची दुर्दशा पाहता या भागातील रस्त्यांमुळे आजारात वाढ झाली आहे. विकासात वाढ झाल्याचे मात्र कुठे चित्र दिसत नाही. भाजपाने सर्वसामान्य नागरिकांना १५ लाख रुपये प्रत्यकाच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात कोणाच्याही खात्यात एक रुपया आला नाही, उलट नोटांचे रंग बदलले, शेतकºयांना सरसगट कर्जमाफी नाही, विविध प्रकारच्या योजनेचा लाभ नाही. पंधरा लाख कुठे गेले, असा प्रश्नही विखे पाटील यांनी उपस्थित केला. विदेशात पळुन जाणाºया व पैसे बुडविणाºया उद्योजकांना मदत केल्याचा आरोप त्यांनी केला. दुष्काळाकरिता पुरेसा पैसा दिलाच नाही, अशा स्थितीत अकोट तालुकाही दुष्काळग्रस्त घोषीत करायला पाहिजे होता असे सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्राAshok Chavanअशोक चव्हाण