शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सेनेला शह देण्यासाठी भाजपची आक्रमक नेत्यांना पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:35 IST

भाजपच्या जिल्ह्याच्या अध्यक्षपदी अभ्यासू आमदार रणधीर सावरकर व महानगराध्यक्षपदी माजी महापौर विजय अग्रवाल यांची निवड केली असल्याचे संकेत आहेत.

- राजेश शेगोकार अकोला: भविष्याच्या राजकारणाची पेरणी ही वर्तमानातील निर्णयांवर अवलंबून असते, असे म्हणतात. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीही अकोल्याच्या भविष्यातील राजकारणाची पेरणी सुरू केली आहे. एकेकाळचा मित्र असलेला शिवसेना या पक्षाने भाजपाच्या विरोधात उघडलेली आघाडी, आक्रमक असे पालकमंत्री अन् एकहाती सत्ता असलेल्या महापालिकेच्या कारभाराच्या चौकशीसाठी गठित समिती अशा घटनांच्या पृष्ठभूमीवर जिल्हा व शहर अशा दोन्ही आघाडीवर आक्रमक चेहरा देण्याच्या प्रयत्नातूनच भाजपच्या जिल्ह्याच्या अध्यक्षपदी अभ्यासू आमदार रणधीर सावरकर व महानगराध्यक्षपदी माजी महापौर विजय अग्रवाल यांची निवड केली असल्याचे संकेत आहेत.अकोल्याच्या राजकारणात खा. धोत्रे यांचा प्रभाव सर्वश्रुत आहे. अकोला महापालिकेत एकहाती सत्ता मिळवून त्यांनी आपली पकड दाखवून दिली. स्वत: चौथ्यांदा खासदार अन् केंद्रीय राज्यमंत्री पद ही सारी ताकद विधानसभेत लावून युतीला शत-प्रतिशत यश मिळवून दिले. दरम्यानच्या काळात राज्यात युतीचे फाटले अन् आतापर्यंत मित्र असलेला शिवसेना पक्ष सत्तेत आल्यानंतर आक्रमकपणे विरोधात उभा ठाकला. खा. धोत्रे यांच्या नेतृत्वात यश मिळविलेली महापालिका असेल किंवा शहरातील विकास कामे असतील, यांच्याविरोधात आक्रमकपणे आवाज उठविला गेला नव्हता. महापालिकेच्या सभेत राडा झाला की नंतर पुढच्या सभेपर्यंत शांतता असाच आतापर्यंतच्या आंदोलनाचा इतिहास आहे. याला काही अपवादही असले तरी ते बोटावर मोजता येतील असे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी महापालिकेतील अनागोंदी कारभाराचा लेखाजोखा थेट विधिमंडळापर्यंत नेला आहे. शौचालयांचा घोळ, फोर-जी प्रकरणात चव्हाट्यावर आलेली महापालिकेची इज्जत, करवाढीच्या प्रकरणात न्यायालयात तोंडावर आपटलेले प्रशासन, अमृत योजनेतील अनियमितता अशा एक ना अनेक प्रकरणांची पोलखोल विरोधकांनी सुरू केली आहे. आता विधिमंडळाची उपसमितीही नेमल्या गेली आहे. त्यामुळे भाजपाची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी आक्रमक व अभ्यासू अशा आ. रणधीर सावरकर यांची तसेच हा सारा कथित घोळ ज्यांच्या काळात झाल्याचा आरोप आहे, ते माजी महापौर यांच्या हाती जिल्हा व महानगराची सूत्रे देऊन जशास तसे उत्तर दिले जाईल, हे संकेतच भाजपाने दिले आहेत.आ. सावरकर यांनी पहिल्याच टर्ममध्ये आक्रमक व अभ्यासू आमदार अशी ओळख निर्माण केली आहे. अकोला पूर्व हा त्यांचा मतदारसंघ असला तरी जिल्ह्याच्या कोणत्याही प्रश्नावर धावून जाताना त्यांना मतदारसंघाची कधीही आडकाठी आली नाही. खा. धोत्रे हे दिल्लीत व्यस्त असल्याने येथील पक्षसंघटनेवरची पकड सैल होणार नाही, तर अधिक प्रभावी होईल, हाही प्रयत्न आ. सावरकर यांच्या निवडीमागे आहे. दुसरीकडे विजय अग्रवाल यांनी महापालिका त्यांच्या शैलीने चालविली. पक्षाकडून एखादा निर्णय घेतला तर त्याची अंमलबजावणी करताना ते कोणाचीही भीडभाड ठेवत नव्हते. त्यामुळेच फाइल गहाळ प्रकरण असो की गुंठेवारीच्या प्रकरणात त्यांनी तातडीने पुढाकार घेत महापालिकेची भूमिका मांडली. आगामी काळात सेना व भाजपा हा संघर्ष चांगलाच पेटणार असल्याने पक्षाला आक्रमक नेतृत्वाची गरज होती, ती या दोघांच्या निवडीमुळे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाPoliticsराजकारणRandhir Savarkarरणधीर सावरकर