शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
5
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
6
PM Kisan योजनेच्या २० हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
7
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
8
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
9
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
10
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
11
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
12
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
14
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
15
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
16
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
17
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
18
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...
19
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
20
दहावीतील गुणांवरून नातेवाईकांनी उडवली होती खिल्ली, आता तरुणाने बँकेचा SMS दाखवला; आकडा पाहून 'बोलती बंद'

सेनेला शह देण्यासाठी भाजपची आक्रमक नेत्यांना पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:35 IST

भाजपच्या जिल्ह्याच्या अध्यक्षपदी अभ्यासू आमदार रणधीर सावरकर व महानगराध्यक्षपदी माजी महापौर विजय अग्रवाल यांची निवड केली असल्याचे संकेत आहेत.

- राजेश शेगोकार अकोला: भविष्याच्या राजकारणाची पेरणी ही वर्तमानातील निर्णयांवर अवलंबून असते, असे म्हणतात. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीही अकोल्याच्या भविष्यातील राजकारणाची पेरणी सुरू केली आहे. एकेकाळचा मित्र असलेला शिवसेना या पक्षाने भाजपाच्या विरोधात उघडलेली आघाडी, आक्रमक असे पालकमंत्री अन् एकहाती सत्ता असलेल्या महापालिकेच्या कारभाराच्या चौकशीसाठी गठित समिती अशा घटनांच्या पृष्ठभूमीवर जिल्हा व शहर अशा दोन्ही आघाडीवर आक्रमक चेहरा देण्याच्या प्रयत्नातूनच भाजपच्या जिल्ह्याच्या अध्यक्षपदी अभ्यासू आमदार रणधीर सावरकर व महानगराध्यक्षपदी माजी महापौर विजय अग्रवाल यांची निवड केली असल्याचे संकेत आहेत.अकोल्याच्या राजकारणात खा. धोत्रे यांचा प्रभाव सर्वश्रुत आहे. अकोला महापालिकेत एकहाती सत्ता मिळवून त्यांनी आपली पकड दाखवून दिली. स्वत: चौथ्यांदा खासदार अन् केंद्रीय राज्यमंत्री पद ही सारी ताकद विधानसभेत लावून युतीला शत-प्रतिशत यश मिळवून दिले. दरम्यानच्या काळात राज्यात युतीचे फाटले अन् आतापर्यंत मित्र असलेला शिवसेना पक्ष सत्तेत आल्यानंतर आक्रमकपणे विरोधात उभा ठाकला. खा. धोत्रे यांच्या नेतृत्वात यश मिळविलेली महापालिका असेल किंवा शहरातील विकास कामे असतील, यांच्याविरोधात आक्रमकपणे आवाज उठविला गेला नव्हता. महापालिकेच्या सभेत राडा झाला की नंतर पुढच्या सभेपर्यंत शांतता असाच आतापर्यंतच्या आंदोलनाचा इतिहास आहे. याला काही अपवादही असले तरी ते बोटावर मोजता येतील असे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी महापालिकेतील अनागोंदी कारभाराचा लेखाजोखा थेट विधिमंडळापर्यंत नेला आहे. शौचालयांचा घोळ, फोर-जी प्रकरणात चव्हाट्यावर आलेली महापालिकेची इज्जत, करवाढीच्या प्रकरणात न्यायालयात तोंडावर आपटलेले प्रशासन, अमृत योजनेतील अनियमितता अशा एक ना अनेक प्रकरणांची पोलखोल विरोधकांनी सुरू केली आहे. आता विधिमंडळाची उपसमितीही नेमल्या गेली आहे. त्यामुळे भाजपाची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी आक्रमक व अभ्यासू अशा आ. रणधीर सावरकर यांची तसेच हा सारा कथित घोळ ज्यांच्या काळात झाल्याचा आरोप आहे, ते माजी महापौर यांच्या हाती जिल्हा व महानगराची सूत्रे देऊन जशास तसे उत्तर दिले जाईल, हे संकेतच भाजपाने दिले आहेत.आ. सावरकर यांनी पहिल्याच टर्ममध्ये आक्रमक व अभ्यासू आमदार अशी ओळख निर्माण केली आहे. अकोला पूर्व हा त्यांचा मतदारसंघ असला तरी जिल्ह्याच्या कोणत्याही प्रश्नावर धावून जाताना त्यांना मतदारसंघाची कधीही आडकाठी आली नाही. खा. धोत्रे हे दिल्लीत व्यस्त असल्याने येथील पक्षसंघटनेवरची पकड सैल होणार नाही, तर अधिक प्रभावी होईल, हाही प्रयत्न आ. सावरकर यांच्या निवडीमागे आहे. दुसरीकडे विजय अग्रवाल यांनी महापालिका त्यांच्या शैलीने चालविली. पक्षाकडून एखादा निर्णय घेतला तर त्याची अंमलबजावणी करताना ते कोणाचीही भीडभाड ठेवत नव्हते. त्यामुळेच फाइल गहाळ प्रकरण असो की गुंठेवारीच्या प्रकरणात त्यांनी तातडीने पुढाकार घेत महापालिकेची भूमिका मांडली. आगामी काळात सेना व भाजपा हा संघर्ष चांगलाच पेटणार असल्याने पक्षाला आक्रमक नेतृत्वाची गरज होती, ती या दोघांच्या निवडीमुळे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाPoliticsराजकारणRandhir Savarkarरणधीर सावरकर