शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

भुसावळ-वर्धा पॅसेंजर ‘मेमू’मध्ये रूपांतरित होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:54 IST

भुसावळ ते वर्धा व वर्धा ते भुसावळ या पॅसेंजर गाड्या ‘मेमू’मध्ये रूपांतरित करण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी सोमवारी आॅनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर रेल्वेची प्रवासी वाहतूक सेवा बंद असली तरी, केंद्राकडून प्रवासी गाड्या सुरू करण्यास ‘ग्रीन सिग्नल’ मिळेल, तेव्हा भुसावळ ते वर्धा व वर्धा ते भुसावळ या पॅसेंजर गाड्या ‘मेमू’मध्ये रूपांतरित करण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी सोमवारी आॅनलाइन पत्रकार परिषदेत दिली.यावेळी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील, वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक आर. के. शर्मा, मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितिज गुरव, वरिष्ठ मंडळ सिंग्नल अभियंता निशांत द्विवेदी, उपमुख्य अभियंता (निर्माण) रोहित थावरे तर मुंबई येथून मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार उपस्थित होते.कोरोना संकट काळात मध्य रेल्वेने अडगळीत पडलेल्या रेल्वे डब्यांमध्ये कमीत-कमी खर्च करून ८८२ आयसोलेशन कोच तयार केले असून, यापैकी ३० आयसोलेशन कोच भुसावळ मंडळात आहेत. सुदैवाने भुसावळ मंडळातील कोणत्याही स्थानकांवर या कोचेसची गरज पडली नाही.गरज भासल्यास मंडळाअंतर्गत येणाऱ्या रेल्वेस्थानकांवर आयसोलेशन कोचेस पाठविण्यात येतील, असेही विवेक कुमार यांनी सांगितले. अकोला शहरातील रेल्वे मालधक्का बंद झाल्यानंतर तो बोरगाव मंजू येथे हलविण्यात आला आहे. या ठिकाणी आणखी सुविधा पुरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मागणी झाल्यास किसान ट्रेनची संख्या वाढवणारभुसावळ मंडळात आठवड्यातून दोन दिवस किसान विशेष रेल्वे चालविली जात आहे. मागणी वाढल्यास या विशेष रेल्वेची संख्या वाढविण्यात येईल. मागणी झाल्यास अकोला येथील शेतकऱ्यांनाही किसान विशेष रेल्वेचा लाभ देता येईल, असेही गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वे