शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

शेतकरी, शेतमजुरांना पेन्शनसाठी भारतीय संग्राम परिषदेचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 18:06 IST

अकोला : शेतकरी व शेतमजूरांचे दु:ख जाणून त्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेने कंबर कसली आहे.

अकोला : शेतकरी व शेतमजूरांचे दु:ख जाणून त्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेने कंबर कसली आहे. भारतीय संग्राम परिषद राज्यभरात शेतकरी व शेतमजुरांना पेन्शन योजना शासनाकडून लागू करवून घेण्यासाठी लढा देणार आहे. शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनात शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वात हा लढा लढल्या जाणार आहे.जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाठया शेतकऱ्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत मातीत राब राब राबवावे लागते. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ शेतकºयांना अश्रू गाळायला लावतो. तरीही प्रत्येक परिस्थितीत हिंमतआणि धैर्य एकवटून शेतकरी शेती कसत राहतो. एवढे करुनही नशीबी सुखाचे जिवन नसतेच. मुला मुलींना उच्च शिक्षण घेता येत नाही. मुला मुलींचे लग्न जुळविण्यात अडचणी येतात. अशा परिस्थितीत संपूर्ण जीवन घालविल्यानंतर उतार वयात शेतात काम करण्या इतकी शक्ती शेतकरी व शेतमजूरांमधे राहत नाही.त्यामुळेच ६० किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या स्त्री, पुरुष शेतकरी व शेतमजूरांना स्वाभीमानाने जगता यावे यासाठी शासनाने अशा शेतकरी व शेतमजुरांसाठी प्रतिमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळावे म्हणून पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकºयांच्या हक्कासाठी लढा उभारला आहे. यामधे ६० वर्षांपेक्ष अधिक वय असलेल्या शेतकरी व शेत मजुरांकडून रितसर अर्ज भरवून घेतल्या जात आहेत. हे सर्व अर्ज आ. विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्र्यांना सोपविल्या जाणार आहे. या शिवसंग्रामच्या व भारतीय संग्राम परिषदेच्या लढ्यामधे जास्तीत जास्त शेतकरी व शेतमजुरांनी सहभागी होवून पेन्शन योजनेच्या मागणीसाठी अर्ज भरुन द्यावे, असे आवाहन शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी केले आहे

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीPoliticsराजकारण