शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, शेतमजुरांना पेन्शनसाठी भारतीय संग्राम परिषदेचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 18:06 IST

अकोला : शेतकरी व शेतमजूरांचे दु:ख जाणून त्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेने कंबर कसली आहे.

अकोला : शेतकरी व शेतमजूरांचे दु:ख जाणून त्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेने कंबर कसली आहे. भारतीय संग्राम परिषद राज्यभरात शेतकरी व शेतमजुरांना पेन्शन योजना शासनाकडून लागू करवून घेण्यासाठी लढा देणार आहे. शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनात शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वात हा लढा लढल्या जाणार आहे.जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाठया शेतकऱ्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत मातीत राब राब राबवावे लागते. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ शेतकºयांना अश्रू गाळायला लावतो. तरीही प्रत्येक परिस्थितीत हिंमतआणि धैर्य एकवटून शेतकरी शेती कसत राहतो. एवढे करुनही नशीबी सुखाचे जिवन नसतेच. मुला मुलींना उच्च शिक्षण घेता येत नाही. मुला मुलींचे लग्न जुळविण्यात अडचणी येतात. अशा परिस्थितीत संपूर्ण जीवन घालविल्यानंतर उतार वयात शेतात काम करण्या इतकी शक्ती शेतकरी व शेतमजूरांमधे राहत नाही.त्यामुळेच ६० किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या स्त्री, पुरुष शेतकरी व शेतमजूरांना स्वाभीमानाने जगता यावे यासाठी शासनाने अशा शेतकरी व शेतमजुरांसाठी प्रतिमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळावे म्हणून पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकºयांच्या हक्कासाठी लढा उभारला आहे. यामधे ६० वर्षांपेक्ष अधिक वय असलेल्या शेतकरी व शेत मजुरांकडून रितसर अर्ज भरवून घेतल्या जात आहेत. हे सर्व अर्ज आ. विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्र्यांना सोपविल्या जाणार आहे. या शिवसंग्रामच्या व भारतीय संग्राम परिषदेच्या लढ्यामधे जास्तीत जास्त शेतकरी व शेतमजुरांनी सहभागी होवून पेन्शन योजनेच्या मागणीसाठी अर्ज भरुन द्यावे, असे आवाहन शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी केले आहे

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीPoliticsराजकारण