शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

‘बंडोबां’ना रोखण्यासाठी ‘भारिप’ ची त्रिसदस्यीय समिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 10:19 IST

अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या पक्षाच्या ‘बंडोबां’ना रोखण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने २७ डिसेंबर रोजी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे काही गट आणि पंचायत समित्यांच्या काही गणांमध्ये कार्यक्षेत्राबाहेरील (पार्सल) उमेदवारांना भारिप बहुजन महासंघाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या पक्षाच्या स्थानिक उमेदवारांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या पक्षाच्या ‘बंडोबां’ना रोखण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने २७ डिसेंबर रोजी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. जिल्ह्यात बैठका घेऊन, बंडखोर उमेदवारांना पक्षाची भूमिका पटवून सांगण्याच्या सूचना भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी त्रिसदस्यीय समितीला पत्राद्वारे दिल्या आहेत.जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या १३ पेक्षा जास्त गटांमध्ये आणि संबंधित गटांच्या पंचायत समित्यांच्या गणांमध्ये गट व गणाच्या कार्यक्षेत्राबाहेरील (पार्सल) उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे नाराज झालेल्या पक्षाच्या स्थानिक उमेदवारांनी बंडखोरी करीत, पार्सल उमेदवारांविरुद्ध जिल्हा परिषदेच्या संबंधित गटांमध्ये व पंचायत समितीच्या गणांमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. भारिप-बमसंच्या नाराज अपक्ष उमेदवारांनी एकत्र येत ‘पॅनल’ देखील तयार केले आहेत.या पृष्ठभूमीवर भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी २७ डिसेंबर रोजी पत्राद्वारे दिलेल्या सूचनांनुसार, अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेल्या पक्षाच्या बंडखोर उमेदवारांना रोखण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती जिल्ह्यात बैठका घेऊन पक्षाचे कार्यकर्ते व अपक्ष उमेदवारांसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहे. तसेच पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसाठी बंडखोर अपक्ष उमेदवारांना रोखण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी त्रिसदस्यीय समितीला पत्राद्वारे दिल्या आहेत.अशी आहे त्रिसदस्यीय समिती!बंडखोर अपक्ष उमेदवारांना शांत करण्यासाठी भारिप-बमसंच्यावतीने त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रदीप वानखडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर व दामोदर जगताप यांचा समावेश आहे. या समितीसोबतच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी.जे. वानखडे, जिल्हा महासचिव डॉ.एम.आर. इंगळे यांनीसुद्धा पक्षाच्या नाराज अपक्ष उमेदवारांना शांत करण्यासाठी प्रयत्न करून, त्यासंदर्भात सूचना देण्याचेही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी संबंधितांना सांगीतले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर