शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

‘बंडोबां’ना रोखण्यासाठी ‘भारिप’ ची त्रिसदस्यीय समिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 10:19 IST

अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या पक्षाच्या ‘बंडोबां’ना रोखण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने २७ डिसेंबर रोजी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे काही गट आणि पंचायत समित्यांच्या काही गणांमध्ये कार्यक्षेत्राबाहेरील (पार्सल) उमेदवारांना भारिप बहुजन महासंघाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या पक्षाच्या स्थानिक उमेदवारांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या पक्षाच्या ‘बंडोबां’ना रोखण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने २७ डिसेंबर रोजी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. जिल्ह्यात बैठका घेऊन, बंडखोर उमेदवारांना पक्षाची भूमिका पटवून सांगण्याच्या सूचना भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी त्रिसदस्यीय समितीला पत्राद्वारे दिल्या आहेत.जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या १३ पेक्षा जास्त गटांमध्ये आणि संबंधित गटांच्या पंचायत समित्यांच्या गणांमध्ये गट व गणाच्या कार्यक्षेत्राबाहेरील (पार्सल) उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे नाराज झालेल्या पक्षाच्या स्थानिक उमेदवारांनी बंडखोरी करीत, पार्सल उमेदवारांविरुद्ध जिल्हा परिषदेच्या संबंधित गटांमध्ये व पंचायत समितीच्या गणांमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. भारिप-बमसंच्या नाराज अपक्ष उमेदवारांनी एकत्र येत ‘पॅनल’ देखील तयार केले आहेत.या पृष्ठभूमीवर भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी २७ डिसेंबर रोजी पत्राद्वारे दिलेल्या सूचनांनुसार, अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेल्या पक्षाच्या बंडखोर उमेदवारांना रोखण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती जिल्ह्यात बैठका घेऊन पक्षाचे कार्यकर्ते व अपक्ष उमेदवारांसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहे. तसेच पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसाठी बंडखोर अपक्ष उमेदवारांना रोखण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी त्रिसदस्यीय समितीला पत्राद्वारे दिल्या आहेत.अशी आहे त्रिसदस्यीय समिती!बंडखोर अपक्ष उमेदवारांना शांत करण्यासाठी भारिप-बमसंच्यावतीने त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रदीप वानखडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर व दामोदर जगताप यांचा समावेश आहे. या समितीसोबतच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी.जे. वानखडे, जिल्हा महासचिव डॉ.एम.आर. इंगळे यांनीसुद्धा पक्षाच्या नाराज अपक्ष उमेदवारांना शांत करण्यासाठी प्रयत्न करून, त्यासंदर्भात सूचना देण्याचेही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी संबंधितांना सांगीतले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर