शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी भारिपचा धडक मोर्चा

By admin | Updated: July 14, 2015 02:15 IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा; दुबार पेरणीसाठी अनुदान देण्याची मागणी.

अकोला : दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांचे कर्ज सरसकट माफ करून, दुबार पेरणीसाठी शंभर टक्के अनुदान देण्याच्या मागणीकरिता भारिप-बहुजन महासंघ जिल्हा शाखेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरी, जोरदार पाऊस झाला नसल्याने, शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडील कर्ज शासनाकडून सरसकट माफ करण्यात यावे, तसेच दुबार पेरणीसाठी शेतकर्‍यांना शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, पीक विम्याची रक्कम तातडीने शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, रोजगार हमी योजनेंतर्गत तातडीने कामे सुरू करून, बेरोजगार व मजुरांना कामे उपलब्ध करुन द्यावी,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंंना मोफत प्रवास पास उपलब्ध करुन देण्यात यावा,नगरपालिका, महानगरपालिका हद्दीतील रमाई आवास घरकूल योजनांची तातडीने अंमलबजाणी करुन घरकुलांचा प्रश्न मार्गी लावावा, विविध योजनांतर्गत प्राप्त निधीचे लाभार्थींंंना वितरण करण्यात यावे आणि सामाजिक न्याय भवनाचा रखडलेला प्रश्न तातडीने मार्गी लावावा इत्यादी मागण्यांसाठी भारिप-बमसं जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील टॉवरचौकस्थित भारिप-बमसंच्या जिल्हा कार्यालयासमोरून काढण्यात आलेला मोर्चा बसस्थानक समोरून गांधी रोड, तहसील कार्यालय मार्गे मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. यावेळी पक्षाच्या नेत्यांनी मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर एका शिष्टमंडळामार्फत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांना सादर करण्यात आले.