शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वाढीव वीज बिलांचा शॉक; वंचितच्यावतीने विश्वासघात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 17:24 IST

Akola News वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आघाडी सरकारने नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करीत विश्वासघात आंदोलन करण्यात आले.

अकाेला :  लॉकडाऊनकाळात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसला. आधीच अनेकांचे रोजगार गेले, त्यात वाढीव वीज बिले भरावीच लागणार, त्यामध्ये सवलत मिळणार नाही, असे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केल्याने,या धाेरणाच्या विरोधात बुधवारी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आघाडी सरकारने नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करीत विश्वासघात आंदोलन करण्यात आले.

प्रदेश प्रवक्ता तथा युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, प्रदेश प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन फुंडकर, प्रदेश महिला महासचिव अरुंधती सिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा सिरसाट, प्रदीप वानखडे यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर झालेल्या या आंदाेलनावेळी शासनाच्या विराेधात नारे देण्यात आले. ज्यांनी वीज वापरली आहे, त्यांना बिल भरावं लागेल, असं नितीन राऊत यांनी जाहीर केल्याने या सरकारने सामान्य जनतेशी विश्वासघात केल्याचा आराेप करण्यात आला.

लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांकडील मीटर रिडिंग घेण्यात आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात ग्राहकांना सरासरी वीज वापरानुसार वीज बिल देण्यात आले. मार्चनंतर प्रथमच थेट जूनमध्ये मीटर रिडिंग घेण्यात येत आहे. त्यामुळे मार्चपासून ते जूनमध्ये रिडिंग घेईपर्यंत एकूण वीज वापराचे एकत्रित व एकत्रित बिल ग्राहकांना देण्यात येत आहे. या बिलामध्ये ग्राहकांची प्रचंड लूट करण्यात येत आहे. ही लूट थांबविण्याची मागणी करण्यात आली. या आंदाेलनात वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा, महिला आघाडी, सम्यक विधार्थी आंदोलन, युवा आघाडी आणि विद्ववत सभा यांनी सहभाग घेतला, यावेळी वीज बिलाची होळी करून राज्यपाल यांना जिल्हाधिकारीमार्फत निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAkolaअकोला