शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

अकाेला विधानपरिषद निवडणुक ठरविणार महाविकास ‘आघाडी’चे भविष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 23:50 IST

-  राजेश शेगाेकार अकाेला : विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणाऱ्यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी रणसंग्राम सुरू झाला आहे. ...

ठळक मुद्देविधान परिषद निवडणूक: पाचही मतदारसंघात लढत.काॅंग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी दाेन, सेना एका जागेवर रिंगणात.

-  राजेश शेगाेकार

अकाेला : विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणाऱ्यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी रणसंग्राम सुरू झाला आहे. या पाचही जागांवर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यामध्ये तुल्यबळ लढत रंगण्याची संकेत आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने एकसंघ महाविकास आघाडीची ताकद समाेर येणार असल्याने भविष्यातील निवडणुकींच्या दृष्टिकाेनातून ही निवडणूक महाविकास आघाडीच्या राजकारणाची नांदी ठरण्याचीच चिन्हे आहेत.

काेराेनाच्या संकटामुळे लांबलेल्या विधान परिषद निवडणुकीची अखेर सुरुवात झाली आहे. राज्यातील नागपूर, औरंगाबाद व पुणे पदवीधर मतदारसंघ तर अमरावती आणि पुणे या विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाने स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर केले आहेत तर या पाच मतदारसंघांपैकी पदवीधर मतदारसंघातील पुणे व औरंगाबाद या जागा राष्ट्रवादी तर नागपूरची जागा काॅंग्रेस लढवत आहे. शिक्षक मतदारसंघात पुण्याची काॅंग्रेस व अमरावतीच्या जागेवर सेनेने उमेदवार दिला आहे. वरवर पाहता ही निवडणूक सार्वत्रिक व पक्षीय राजकारणाची दिसत नसली तरी भाजपा व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमुळे पदवीधराच्या तसेच शिक्षक प्राध्यापकांच्या संघटनांचा प्रभाव संपुष्टात आला आहे. या दाेन पक्षाच्या नेत्यांनीच निवडणुकीची धुरा हातात घेतल्यामुळे ही निवडणूक भाजपा विराेधात महाविकास आघाडी अशा स्वरूपाची झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीतील जय पराजय हा भाजपापेक्षा महाविकास आघाडीच्या भविष्यातील राजकारणाची नांदी ठरणार आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला तर आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी ही ताकद अजमावण्याची संधी महाविकास आघाडीला मिळणार आहे. त्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची ठरत आहे.

 

भाजपामध्ये सबकुछ फडणवीस

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी भाजपाचे उमदेवार ठरविताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच शब्द अंतिम मानला गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपामध्ये फडणवीस यांचे स्थान अधिकच बळकट झाले आहे. विशेषत: नागपूर पदवीधर मतदारसंघातील उमेदवार ठरविताना फडणवीस यांनी दाखविलेले राजकीय चातुर्य यामुळे पक्षात त्यांचा शब्द अंतिम हे पुन्हा एकदा अधाेरेखित झाले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAkolaअकोलाBJPभाजपाShiv Senaशिवसेना