शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निधी खर्च न करणारे बीडीओ गोत्यात!

By admin | Updated: February 19, 2017 02:32 IST

सीईओंनी दिल्या जबाबदार धरण्याच्या नोटिस

सदानंद सिरसाटअकोला, दि. १८- १३ आणि १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याकडे सातही पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांनी कमालीचे दुर्लक्ष केल्याचा प्रकार घडत आहे. त्यासाठी सप्टेंबरपासून आतापर्यंत सहा पत्र दिल्यानंतरही गटविकास अधिकार्‍यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. विकास कामांचा निधी खर्च होत नसल्याने कारवाई प्रस्तावित करण्याची नोटिस मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी दिली आहे. तेराव्या वित्त आयोगातून २0१४-१५ मध्ये प्राप्त निधी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर अनुक्रमे ७0, २0 आणि दहा टक्के या प्रमाणात वाटप करण्यात आला. तो निधी खर्च न झाल्याने त्यासाठी ३१ डिसेंबर २0१६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर १४ व्या वित्त आयोगातून २0१५-१६ मध्ये गावांमध्ये प्राधान्याने करावयाच्या कामासांठी निधी देण्यात आला. तो निधी खर्च करण्याची मुदत ३0 जून २0१६ पर्यंंत वाढवण्यात आली होती. ती मुदतही ३१ डिसेंबर २0१६ पर्यंत दिली. मात्र, त्यातून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण स्तरावर कोणतीही कामे झाली नाही. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विधळे यांनी सप्टेंबर २0१६ पासून फेब्रुवारीपर्यंंत गटविकास अधिकार्‍यांना सातत्याने सहा पत्रे देत हा निधी खर्च करण्याचे बजावले. तरीही निधी खर्चाचा टक्काच वाढत नाही. या प्रकाराला गटविकास अधिकारी जबाबदार आहेत. पंचायत समिती प्रमुख असताना शासन धोरणांची अंमलबजावणी न करणे, आर्थिक खर्चाचे अहवाल सादर न करणे, कामाचा आढावा न घेणे, ग्रामपंचायत स्तरावर प्रचंड निधी पडून असणे, त्या कामावर नियंत्रण नसणे, यासाठी सातही गटविकास अधिकार्‍यांना कारणे दाखवा बजावण्यात आली आहे. निधी खर्च केवळ १५ टक्के शासनाने २0१५-१६ साठी दिलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हय़ात केवळ १५ टक्के खर्च झाल्याची माहिती आहे. ८५ टक्के रक्कम ग्रामपंचायतींच्या खात्यावर तशीच पडून आहे. त्यातून वित्त आयोगाच्या विकास आराखड्यातील कामांची प्रगती दिसून येते.