शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

दुष्काळमुक्तीसाठी शोषखड्ड्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 13:09 IST

अकोला : ग्रामीण भागात तुंबलेल्या नाल्या, गटारांची समस्या निकाली काढण्यासोबतच दुष्काळापासून काही प्रमाणात आधार देणाऱ्या शोषखड्डे निर्मितीच्या कामाकडे शासकीय यंत्रणा, लाभार्थींच्या उदासीनतेमुळे हा उपक्रमच कागदावर ठेवण्याचा प्रकार राज्यात सर्वत्रच सुरू आहे.

अकोला : ग्रामीण भागात तुंबलेल्या नाल्या, गटारांची समस्या निकाली काढण्यासोबतच दुष्काळापासून काही प्रमाणात आधार देणाऱ्या शोषखड्डे निर्मितीच्या कामाकडे शासकीय यंत्रणा, लाभार्थींच्या उदासीनतेमुळे हा उपक्रमच कागदावर ठेवण्याचा प्रकार राज्यात सर्वत्रच सुरू आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद, शासनाचा रोहयो विभागाकडून त्या कामांसाठी जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.ग्रामीण रोजगार हमी योजनेत प्रवर्ग ‘ड’मध्ये ग्रामीण पायाभूत सुविधांमध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या ३२ कामांमध्ये पाणी पुरवठा व स्वच्छतेच्या कामांचाही समावेश करण्यात आला. हगणदारीमुक्त गावाचा दर्जा संपादन करण्याच्या उद्देशाने स्वतंत्रपणे किंवा शासकीय विभागाच्या इतर योजनांच्या अभिसरणातून व्यक्तिगत घरगुती शौचालय, शाळेतील प्रसाधनगृहे, अंगणवाडी-प्रसाधनगृहे, घनकचरा व सांडपाणी यासारखी ग्रामीण स्वच्छतेसंबंधातील कामे त्यामध्ये घेता येतात. त्यापैकी पाणी साठवण, शोषखड्डे निर्मिती हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. ग्रामीण भागातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्ड्यांचा उपक्रम प्रभावीपणे राबविल्यास त्यातून भूगर्भात पाण्याचे पुनर्भरण होते. त्याचा फायदा दुष्काळावर मात करण्यासाठी होऊ शकतो; मात्र या उपयुक्त उपचाराकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याचा प्रकार घडत आहे.ग्रामीण भागातील जमिनीत पुनर्भरणाचे उपचार अत्यल्प आहेत. त्यामुळेच भूगर्भातील जलपातळी ३०० फुटांपेक्षा अधिकच खोल गेली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे निर्मितीचा उपचार उत्तम पर्याय आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभागातून ही उपाययोजना राबविण्यासाठी यंत्रणा आणि लाभार्थींमध्ये समन्वयच नसल्याने नियोजन कागदावरच उरले आहे.- असे मुरेल जमिनीत पाणी!ग्रामीण भागातील कुटुंबांची संख्या पाहता ती २ लाख २५ हजारांपेक्षा अधिक आहे. या प्रत्येक कुटुंबाने वापर करून सोडलेले सांडपाणी प्रतिदिन ४० लीटरपेक्षाही अधिक असू शकते. ते नाली किंवा गटारात तुंबून राहते. त्यात डासांची निर्मिती होऊन आरोग्याच्या समस्या पुढे येतात. तेच पाणी शोषखड्ड्यात सोडल्यास जमिनीत मुरणार आहे. त्यातून दरदिवशी ९० लाख लीटर पाण्याचे जमिनीत पुनर्भरण होऊ शकते.- वर्षाला ३ अब्ज २४ कोटी लीटर सांडपाणीग्रामीण भागात तुंबणारे, साचणारे घाण पाणी पाहता ते ३ अब्ज २४ कोटी लीटर पाणी दरवर्षी वाया जाते. त्या पाण्याचे पुनर्भरण झाल्यास त्याचा वापरण्यासाठी तरी किमान उपयोग होऊ शकतो; मात्र या शक्यतेकडे दुष्काळातही कुणीच लक्ष देण्यास तयार नसल्याने गावा-गावांतील पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी