ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ६ - जलयुक्त शिवार, दोन कोटी वृक्ष लागवड अशा विविध उपक्रमांतुन शासनाने पर्यावरण संतुलन राखण्यासोबतच शेतक-यांना श्वाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले. हे उपक्रम यशस्वी झाले तर शेतकरी नक्कीच आनंदी राहिल व गणरायाच्या आगमनाने हा आनंद अधिक वृद्धींगत होईल अशा आशयावर आधारीत देखावा अकोल्यात साकारला आहे.
येथील राजेंद्र सोनवणे या पर्यावरण प्रेमी चित्रकाराने रणपिसे नगर मधील बारा ज्योतीर्लिंग परिसरात हा देखावा उभारला आहे. शेतक-याने शेतात शेततळे घेतले, बांधावर झाडे लावली त्यामुळे समृद्धी आली असा संदेश देत असलेल्या या देखाव्यात गणपती चक्क बैलबंडीमध्ये बसुन शेतक-याच्या घरी आल्याने शेतकरी आनंदी झाल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. या सोबतच आदीवासी नृत्य करणाºया बाहुल्या या देखाव्याचे आकर्षण बनले आहे.