शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

बाखराबाद हत्याकांड; चौघांची निर्घृण हत्या करणाऱ्या पिता-पुत्रांना फाशीची शिक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 12:48 IST

अकोला : बाखराबाद येथील एकाच परिवारातील चौघांच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणी  शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने आरोपी असलेल्या दोन मुले व बापास फाशीची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देविश्वनाथ माळी, वनमाला माळी, योगेश माळी व राजेश माळी यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला चढवित त्यांची हत्या केली होती. या प्रकरणात आरोपींना १४ नोव्हेंबर रोजी दोषी ठरविले होते.झाडाच्या फांद्या तोडाव्या त्याप्रमाणे चौघांची हत्या केल्याने न्यायालयाने तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.

अकोला: शेतीच्या वादातून माळी कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने साक्ष, पुराव्यांच्या आधारे शुक्रवारी आरोपी गजानन वासुदेव माळी याच्यासह त्याचे दोन्ही मुले नंदेश व दीपक माळी यांना फाशीची शिक्षा सुनावली. उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाखराबाद येथे १४ एप्रिल २0१४ रोजी ही घटना घडली होती.   मृतक राजेश व योगेशचे वडील भगवंतराव माळी यांनी आरोपी गजानन वासुदेव माळी याच्याशी दोन एकर शेती खरेदीचा इसार केला होता; परंतु नंतर गजाननने इसार करण्यास नकार दिला. त्यामुळे भगवंतरावांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आणि त्यांच्या न्यायालयाने भगवंतराव माळी यांना शेतीचा ताबा दिला. त्यामुळे १४ एप्रिल रोजी राजेश व योगेश माळी हे शेतात गेले होते. संतप्त गजानन माळी याने त्यांना धमकी दिली होती. योगेशने त्याची तक्रार उरळ पोलिसांत केली होती. तक्रार करून योगेश व राजेश हे बाखराबादला काका विश्वनाथ माळी यांच्याकडे आले. राजेश घरीच थांबला आणि योगेश व चुलत बहीण वनमाला रोकडे हे पुन्हा शेतात गेले. त्यांच्याच पाठोपाठ आरोपी गजानन माळी व त्याचे दोन मुले नंदेश व दीपक हे कडबा कटरचे पाते व कुºहाड घेऊन शेतात गेले आणि त्यांच्यावर सपासप वार करून त्यांना यमसदनी धाडले. त्यानंतर आरोपींनी विश्वनाथ माळी यांच्या घराकडे मोर्चा वळविला आणि घरात खाटेवर बसलेल्या राजेश माळीवर वार करून त्यास ठार केले. समोरून वृद्ध विश्वनाथ माळी येताना दिसल्यावर, त्यांच्यावरही वार करून ठार केले. या घटनेची एकमेव साक्षीदार पार्वतीबाई विश्वनाथ माळी या होत्या. पोलीस पाटील दत्ताराम माळी यांच्या तक्रारीनुसार उरळ पोलिसांनी भादंवि कलम ३0२, ४५२, १२0 ब (३४) नुसार दाखल करून आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात तिसरे जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने आठ साक्षीदार तपासले. अखेर न्यायालयाने तीनही आरोपींना भादंवि कलम ३0२ सहकलम १२0 ब नुसार फाशीची शिक्षा सुनावली व प्रत्येकी १0 हजार रुपये दंड सुनावला. दंड न भरल्यास एक सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी विधिज्ञ अ‍ॅड. गिरीश देशपांडे यांनी बाजू मांडली. 

बचाव पक्षाने केली आरोपींवर दयेची याचनायुक्तिवाद करताना बचाव पक्षाने आरोपींचे वय लक्षात घेता, त्यांच्यावर दया दाखवावी आणि त्यांना फाशीची शिक्षा देऊ नये, अशी याचना केली; परंतु ही याचना न्यायालयाने फेटाळून लावली.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय