शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

पाणीटंचाईग्रस्त गावातील महिलांनी अडविली बच्चू कडू यांची गाडी

By नितिन गव्हाळे | Updated: March 28, 2024 19:48 IST

खांबोरा गावात गेल्या एक महिन्यापासून पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही.

अकोला : बारुल्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न भीषण झाला असून, उगवा, पाळोदी, आगर व लगतच्या गावांमध्ये देखील पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाणीटंचाईच्या प्रश्नावर महिला आक्रमक झाल्या आहेत. पाळोदी येथे एका कार्यक्रमासाठी माजी पालकमंत्री बच्चू कडू जात असल्याचे पाहून, पाळोदी गावातील महिलांनी त्यांची चारचाकी गाडी अडवून पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. खांबोरा गावात गेल्या एक महिन्यापासून पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही.

अनेकदा संबंधित तसेच ग्रामसेवक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, मात्र तोडगा निघाला नाही. दरम्यान, अकोला तालुक्यातील ग्राम पाळोदी गावात एका कार्यक्रमासाठी आमदार बच्चू कडू जात होते. दरम्यान, उगवा फाट्यावर पाणीटंचाईग्रस्त गावातील महिलांनी त्यांना थांबवून पाणीटंचाईची समस्या दूर करण्याची मागणी या महिलांनी केली. यावेळी पालकमंत्री नसलो तरी पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतो, असे सांगत, आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना फोन लावून खांबोरा गावातील पाणीटंचाईची माहिती दिली आणि पिण्यासाठी पाणी नसल्याने, ग्रामस्थ व महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. तात्पुरत्या स्वरूपात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे, अशा सूचना बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAkolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई