शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
3
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
4
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
5
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
6
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
7
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
8
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
9
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
10
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
11
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
12
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
14
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
15
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
16
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
17
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
18
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
19
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
20
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!

पाणीटंचाईग्रस्त गावातील महिलांनी अडविली बच्चू कडू यांची गाडी

By नितिन गव्हाळे | Updated: March 28, 2024 19:48 IST

खांबोरा गावात गेल्या एक महिन्यापासून पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही.

अकोला : बारुल्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न भीषण झाला असून, उगवा, पाळोदी, आगर व लगतच्या गावांमध्ये देखील पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाणीटंचाईच्या प्रश्नावर महिला आक्रमक झाल्या आहेत. पाळोदी येथे एका कार्यक्रमासाठी माजी पालकमंत्री बच्चू कडू जात असल्याचे पाहून, पाळोदी गावातील महिलांनी त्यांची चारचाकी गाडी अडवून पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. खांबोरा गावात गेल्या एक महिन्यापासून पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही.

अनेकदा संबंधित तसेच ग्रामसेवक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, मात्र तोडगा निघाला नाही. दरम्यान, अकोला तालुक्यातील ग्राम पाळोदी गावात एका कार्यक्रमासाठी आमदार बच्चू कडू जात होते. दरम्यान, उगवा फाट्यावर पाणीटंचाईग्रस्त गावातील महिलांनी त्यांना थांबवून पाणीटंचाईची समस्या दूर करण्याची मागणी या महिलांनी केली. यावेळी पालकमंत्री नसलो तरी पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतो, असे सांगत, आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना फोन लावून खांबोरा गावातील पाणीटंचाईची माहिती दिली आणि पिण्यासाठी पाणी नसल्याने, ग्रामस्थ व महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. तात्पुरत्या स्वरूपात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे, अशा सूचना बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAkolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई