शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

फवारणीतून विषबाधेच्या घटनेनंतर जागृती; कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 14:40 IST

फवारणीतून विषबाधेच्या १०५ घटना घडल्यानंतर शेतकºयांमध्ये जागृती करण्याचा कृषी विभागाचा हा प्रकार वरातीमागून घोडे हाकण्याचा ठरत आहे.

- संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून शेतकरी-शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्यानंतर कीटनाशकाची फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीसंदर्भात घडीपत्रिकांद्वारे शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याची मोहीम कृषी विभागामार्फत येत्या आठ दिवसात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात २७ आॅगस्टपर्यंत कीटकनाशक फवारणीतून विषबाधेच्या १०५ घटना घडल्यानंतर शेतकºयांमध्ये जागृती करण्याचा कृषी विभागाचा हा प्रकार वरातीमागून घोडे हाकण्याचा ठरत आहे.पिकांवरील विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करताना आॅगस्ट महिन्यात (२७ आॅगस्टपर्यंत) जिल्ह्यात १०५ शेतकºयांना विषबाधा झाली. कीटकनाशकाच्या फवारणीतून शेतकरी व शेतजुरांना विषबाधा होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर, कीटकनाशक फवारणी करताना व कीटनाशकाची हाताळणी करताना काय काळजी घेतली पाहिजे, कोणत्या कीटकनाशकात कोणती बुरशीनाशके मिसळावीत, कोणत्या कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाचे किती प्रमाणात द्रावण तयार करावे, कीटकनाशके खरेदी करताना व साठवणूक करताना काय काळजी घ्यावी, यासंदर्भात येत्या आठ दिवसात जिल्ह्यातील शेतकºयांना घडीपत्रिकांद्वारे घरपोच मार्गदर्शन करण्याची मोहीम जिल्हा कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. कीटकनाशकाच्या फवारणीतून जिल्ह्यातील शेतकºयांना विषबाधाच्या होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर कीटकनाशकाची फवारणी करताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, यासंदर्भात शेतकºयांमध्ये जागृती करण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणारी मोहीम म्हणजे वरातीमागून घोडे हाकण्याचा प्रकार असल्याचा प्रत्यय येत आहे.विषबाधित २२ शेतकºयांवर उपचार सुरू!कीटकनाशक फवारणीतून आॅगस्ट महिन्यात २७ आॅगस्टपर्यंत विषबाधा झालेल्या जिल्ह्यातील १०५ शेतकºयांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यापैकी विषबाधित २२ शेतकºयांवर सध्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आॅगस्ट महिन्यात २७ आॅगस्टपर्यंत कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झाल्याने जिल्ह्यातील १०५ शेतकºयांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी विषबाधित २२ शेतकरी सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे.-डॉ. कुसुमाकर घोरपडेअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करताना शेतकºयांनी जागृत असले पाहिजे. जीव अनमोल आहे. त्यामुळे फवारणी करताना शेतकरी -शेतमजुरांनी काळजी घेऊन संरक्षक किटचा वापर केला पाहिजे.-जितेंद्र पापळकरजिल्हाधिकारी

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी