शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

फवारणीतून विषबाधेच्या घटनेनंतर जागृती; कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 14:40 IST

फवारणीतून विषबाधेच्या १०५ घटना घडल्यानंतर शेतकºयांमध्ये जागृती करण्याचा कृषी विभागाचा हा प्रकार वरातीमागून घोडे हाकण्याचा ठरत आहे.

- संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून शेतकरी-शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्यानंतर कीटनाशकाची फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीसंदर्भात घडीपत्रिकांद्वारे शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याची मोहीम कृषी विभागामार्फत येत्या आठ दिवसात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात २७ आॅगस्टपर्यंत कीटकनाशक फवारणीतून विषबाधेच्या १०५ घटना घडल्यानंतर शेतकºयांमध्ये जागृती करण्याचा कृषी विभागाचा हा प्रकार वरातीमागून घोडे हाकण्याचा ठरत आहे.पिकांवरील विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करताना आॅगस्ट महिन्यात (२७ आॅगस्टपर्यंत) जिल्ह्यात १०५ शेतकºयांना विषबाधा झाली. कीटकनाशकाच्या फवारणीतून शेतकरी व शेतजुरांना विषबाधा होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर, कीटकनाशक फवारणी करताना व कीटनाशकाची हाताळणी करताना काय काळजी घेतली पाहिजे, कोणत्या कीटकनाशकात कोणती बुरशीनाशके मिसळावीत, कोणत्या कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाचे किती प्रमाणात द्रावण तयार करावे, कीटकनाशके खरेदी करताना व साठवणूक करताना काय काळजी घ्यावी, यासंदर्भात येत्या आठ दिवसात जिल्ह्यातील शेतकºयांना घडीपत्रिकांद्वारे घरपोच मार्गदर्शन करण्याची मोहीम जिल्हा कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. कीटकनाशकाच्या फवारणीतून जिल्ह्यातील शेतकºयांना विषबाधाच्या होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर कीटकनाशकाची फवारणी करताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, यासंदर्भात शेतकºयांमध्ये जागृती करण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणारी मोहीम म्हणजे वरातीमागून घोडे हाकण्याचा प्रकार असल्याचा प्रत्यय येत आहे.विषबाधित २२ शेतकºयांवर उपचार सुरू!कीटकनाशक फवारणीतून आॅगस्ट महिन्यात २७ आॅगस्टपर्यंत विषबाधा झालेल्या जिल्ह्यातील १०५ शेतकºयांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यापैकी विषबाधित २२ शेतकºयांवर सध्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आॅगस्ट महिन्यात २७ आॅगस्टपर्यंत कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झाल्याने जिल्ह्यातील १०५ शेतकºयांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी विषबाधित २२ शेतकरी सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे.-डॉ. कुसुमाकर घोरपडेअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करताना शेतकºयांनी जागृत असले पाहिजे. जीव अनमोल आहे. त्यामुळे फवारणी करताना शेतकरी -शेतमजुरांनी काळजी घेऊन संरक्षक किटचा वापर केला पाहिजे.-जितेंद्र पापळकरजिल्हाधिकारी

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी