शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

फवारणीतून विषबाधेच्या घटनेनंतर जागृती; कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 14:40 IST

फवारणीतून विषबाधेच्या १०५ घटना घडल्यानंतर शेतकºयांमध्ये जागृती करण्याचा कृषी विभागाचा हा प्रकार वरातीमागून घोडे हाकण्याचा ठरत आहे.

- संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून शेतकरी-शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्यानंतर कीटनाशकाची फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीसंदर्भात घडीपत्रिकांद्वारे शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याची मोहीम कृषी विभागामार्फत येत्या आठ दिवसात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात २७ आॅगस्टपर्यंत कीटकनाशक फवारणीतून विषबाधेच्या १०५ घटना घडल्यानंतर शेतकºयांमध्ये जागृती करण्याचा कृषी विभागाचा हा प्रकार वरातीमागून घोडे हाकण्याचा ठरत आहे.पिकांवरील विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करताना आॅगस्ट महिन्यात (२७ आॅगस्टपर्यंत) जिल्ह्यात १०५ शेतकºयांना विषबाधा झाली. कीटकनाशकाच्या फवारणीतून शेतकरी व शेतजुरांना विषबाधा होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर, कीटकनाशक फवारणी करताना व कीटनाशकाची हाताळणी करताना काय काळजी घेतली पाहिजे, कोणत्या कीटकनाशकात कोणती बुरशीनाशके मिसळावीत, कोणत्या कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाचे किती प्रमाणात द्रावण तयार करावे, कीटकनाशके खरेदी करताना व साठवणूक करताना काय काळजी घ्यावी, यासंदर्भात येत्या आठ दिवसात जिल्ह्यातील शेतकºयांना घडीपत्रिकांद्वारे घरपोच मार्गदर्शन करण्याची मोहीम जिल्हा कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. कीटकनाशकाच्या फवारणीतून जिल्ह्यातील शेतकºयांना विषबाधाच्या होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर कीटकनाशकाची फवारणी करताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, यासंदर्भात शेतकºयांमध्ये जागृती करण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणारी मोहीम म्हणजे वरातीमागून घोडे हाकण्याचा प्रकार असल्याचा प्रत्यय येत आहे.विषबाधित २२ शेतकºयांवर उपचार सुरू!कीटकनाशक फवारणीतून आॅगस्ट महिन्यात २७ आॅगस्टपर्यंत विषबाधा झालेल्या जिल्ह्यातील १०५ शेतकºयांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यापैकी विषबाधित २२ शेतकºयांवर सध्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आॅगस्ट महिन्यात २७ आॅगस्टपर्यंत कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झाल्याने जिल्ह्यातील १०५ शेतकºयांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी विषबाधित २२ शेतकरी सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे.-डॉ. कुसुमाकर घोरपडेअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करताना शेतकºयांनी जागृत असले पाहिजे. जीव अनमोल आहे. त्यामुळे फवारणी करताना शेतकरी -शेतमजुरांनी काळजी घेऊन संरक्षक किटचा वापर केला पाहिजे.-जितेंद्र पापळकरजिल्हाधिकारी

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी