शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

विदर्भातील ४७ हजार विहिरींच्या सिंचनाचे होणार ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 11:06 AM

विहिरींना पूर्ण करण्यासाठी ३० जून २०२० पर्यंत मुदतवाढ देतानाच पूर्ण झालेल्या विहिरींची सद्यस्थिती तपासण्याचाही आदेश शासनाने दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आत्महत्याग्रस्त विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये धडक सिंचन विहिरी योजनेतून मंजूर ६६ हजार विहिरींपैकी पूर्ण झालेल्या ४७ हजार १०० विहिरींची सद्यस्थिती काय आहे, त्यातून सिंचन होत आहे का, सिंचनात किती वाढ झाली, या मुद्यांच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांकडून त्रयस्थ यंत्रणेची नियुक्ती केली जाणार आहे. नियोजन विभागाने ७ नोव्हेंबर रोजीच्या आदेशात लेखापरीक्षण करण्याचे म्हटले आहे.विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांतील ६६ तालुक्यांमध्ये धडक सिंचन विहीर योजनेतून प्रत्येकी १ हजार विहिरींना २०११ मध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सर्वच योजनांतील म्हणजे, जवाहर विहिरी, धडक सिंचन विहिरी, नरेगातून धडक सिंचन योजनेत घेण्यात आलेल्या विहिरींचाही समावेश करण्यात आला. त्या विहिरींची अंमलबजावणी करताना ४७,०९१ विहिरी पूर्ण झाल्याची माहिती आहे. एकूण विहिरींपैकी ८,००७ विहिरी रद्दही झाल्या. त्यापैकी २,९८५ विहिरींना पुनर्जीवित करण्याला मंजुरी देण्यात आला. त्या विहिरींना पूर्ण करण्यासाठी ३० जून २०२० पर्यंत मुदतवाढ देतानाच पूर्ण झालेल्या विहिरींची सद्यस्थिती तपासण्याचाही आदेश शासनाने दिला आहे.आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लाभार्थींनी पूर्ण केलेल्या विहिरींना प्रत्यक्ष भेट दिली जाणार आहे. त्यासाठी अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यांसह वर्धा जिल्ह्यातही त्रयस्थ यंत्रणेची नियुक्ती करावी लागणार आहे. त्या यंत्रणेकडून विहिरींचे लेखापरीक्षण केले जाईल.पूर्ण झालेल्या ४७,०९१ विहिरींची सद्यस्थिती काय आहे, त्यापैकी किती विहिरींचा वापर सुरू आहे, त्या विहिरींमुळे सिंचनात किती वाढ झाली, या बाबींची माहिती लेखा परीक्षणात नमूद केली जाणार आहे. त्यामुळे आता सिंचन विहीर लाभार्थींच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन विहीरींची पाहणी केली जाणार आहे.विभागीय आयुक्त नेमतील पथकेसहा जिल्ह्यांमध्ये विहिरींची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी लेखा परीक्षणाची जबाबदारी अमरावती व नागपूर विभागीय आयुक्तांवर टाकण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत त्रयस्थ यंत्रणेची नियुक्ती झाल्यानंतर विहिरींना भेटीचा कार्यक्रम सुरू होणार आहे.

टॅग्स :Akolaअकोला