शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बसस्थानकावर होतो लिलाव; प्रवासी लावतो बोली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 15:26 IST

बसस्थानकावर होणाऱ्या लिलावात बसस्थानकावर जमलेले प्रवासी बोली लावतात. अंतिम बोलीत टिकलेल्या व्यक्तीच्या (प्रवाशाच्या) स्वाधीन संबंधित वस्तू केली जाते.

- संजय खांडेकरअकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रत्येक डेपोवर अधून-मधून जाहीर लिलाव होत असतो; मात्र या लिलावाची माहिती किती जणांना आहे, कुणास ठाऊक; पण ही पद्धत न्यायिक आणि लोकाभिमुखासोबतचं स्वागतार्हच म्हणावी लागेल. बसस्थानकावर होणाऱ्या लिलावात बसस्थानकावर जमलेले प्रवासी बोली लावतात. अंतिम बोलीत टिकलेल्या व्यक्तीच्या (प्रवाशाच्या) स्वाधीन संबंधित वस्तू केली जाते.महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये दररोज लाखो लोक प्रवास करीत असतात. प्रवास करीत असताना, कुणी बॅग, सुटकेस, विविध साहित्य, छत्री, दागिने, घड्याळ, कपडे आणि वस्तू विसरून जातात. अनेकजण हरविलेल्या वस्तूंचा शोध घेतात, तर काही घेत नाहीत. मग, या वस्तू या बसगाडीचे वाहक थेट संबंधित डेपोत जमा करतात. डेपोत या बॅगमधील प्रत्येक वस्तूंची बारीकसारीक नोंद कागदावर घेतली जाते आणि ती बॅग, वस्तू डेपोत पेटीबंद होते. त्यानंतर काही कालावधीत या सर्व वस्तू बसस्थानकावर मांडून त्यांचा जाहीर लिलाव केला जातो. याप्रसंगी एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित असतात.

काय आहे हा प्रकार ...महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हजारो बसगाड्या राज्य आणि राज्याच्या बाहेर दररोज ये-जा करीत असतात. या बसगाड्यांमध्ये अनेकदा प्रवासी आपले साहित्य, बॅग, वस्तू विसरून जातात. बेवारस म्हणून बसमध्ये सापडलेल्या या वस्तूंची नियमानुसार नोंद केली जाते. त्यानंतर महामंडळाचे अधिकारी वरिष्ठांसमोर या वस्तूंचा जाहीरपणे लिलाव करतात. त्या वस्तूंची विल्हेवाट लावली जाते. लिलावातून गोळा झालेली रक्कम एसटी महामंडळाच्या महसुलात जमा केली जाते. दंड भरून मिळू शकते वस्तूमहामंडळाच्या बसगाडीत प्रवास करीत असताना जर बॅग किंवा काही वस्तू हरविली तर प्रवासादरम्यानच्या डेपोत जाऊन चौकशी केली पाहिजे. प्रत्येक डेपोत एक सामान पेटी ठेवलेली असते. ओळख पटवून ही वस्तू मिळविता येते; मात्र त्यासाठी नाममात्र दंड भरावा लागतो. 

 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportएसटीAkola Bus Standअकोला बस स्थानक