शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Atal Bihari Vajpayee : अकोलेकर प्रचारकाच्या मुशीत तयार झाले अटलजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 13:22 IST

अकोला : अकोल्याच्या मातीने अनेक व्यक्तिमत्त्वांना आकार दिला. स्व. नारायणराव तर्टे हेदेखील याच मातीतील. अकोल्याच्या संघ प्रचारकाने ग्वाल्हेरमध्ये संघाचे काम करून तरुण वयातील अटलबिहारी वाजपेयी यांना संघात आणले.

ठळक मुद्देसुरुवातीला अटलजी नारायण तर्टे यांना टाळायचे; परंतु नारायणरावांनी त्यांचा पिच्छाच पुरविला. अटलजी वडीलबंधू ब्रजबिहारी, लहान भाऊ प्रेमबिहारी यांच्याबरोबर संघाच्या शाखेवर यायला लागले आणि कधी संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक झाले.नारायणराव तर्टेंसारख्या व्यक्तिमत्त्वाने त्यांना संघ प्रवाहात आणले नसते. अटलजी पंतप्रधान बनले नसते, असे संघात अनेकजण बोलतात.

- नितीन गव्हाळेअकोला : अकोल्याच्या मातीने अनेक व्यक्तिमत्त्वांना आकार दिला. स्व. नारायणराव तर्टे हेदेखील याच मातीतील. अकोल्याच्या संघ प्रचारकाने ग्वाल्हेरमध्ये संघाचे काम करून तरुण वयातील अटलबिहारी वाजपेयी यांना संघात आणले. त्यांच्यावर संघ संस्कार केले. त्यांच्यातील व्यक्तिमत्त्वाला झळाळी दिली. नारायणराव तर्टेंसारख्या समर्पित व्यक्तिमत्त्वाने अटलजींना घडविलेच नाही, तर या देशाला एक पंतप्रधान देण्याचे काम केले.स्व. नारायणराव तर्टे हे अकोल्यातील. तसा राजयोगी नेता पुस्तकामध्येदेखील उल्लेख आहे. नारायण तर्टे हे संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक. संघाचा प्रचारक म्हणून आपणही काम करावे, असे त्यांना वाटायचे. त्यांच्या आग्रहाखातर सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांनी त्यांना १९३७-१९४३ दरम्यान ग्वाल्हेरला संघ प्रचारक म्हणून पाठविले. या ठिकाणी गेल्यावर त्यांनी संघाचे काम सुरू केले. ग्वाल्हेरमध्ये काम करताना ते नेहमी अटलबिहारी यांच्या घरी जात असत. सुरुवातीला अटलजी नारायण तर्टे यांना टाळायचे; परंतु नारायणरावांनी त्यांचा पिच्छाच पुरविला. हळूहळू अटलजी वडीलबंधू ब्रजबिहारी, लहान भाऊ प्रेमबिहारी यांच्याबरोबर संघाच्या शाखेवर यायला लागले आणि कधी संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक झाले, हे त्यांनाही कळले नाही. अटलजी, नारायणराव तर्टे यांना मामू म्हणत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अटलजींवर प्रभाव पडला होता. पुढे नारायणराव पिलीभीत आणि नंतर लखनऊला प्रचारक म्हणून गेले. तेव्हाही अटलजींचा नारायणरावांशी स्नेह होता. नारायणरावांसोबत राष्ट्रधर्म मासिकातही अटलजींनी काम केले. त्यानंतर अटलजींनी ‘पांचजन्य’चे संपादक म्हणून काम केले. पुढे जनसंघाचे नेते म्हणून अटलजी काम करून लागले. खासदार झाले. देशाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री बनले आणि पुढे भाजपची सत्ता आल्यावर अटलजी देशाचे पंतप्रधान बनले. नारायणराव तर्टेंसारख्या व्यक्तिमत्त्वाने त्यांना संघ प्रवाहात आणले नसते. अटलजी पंतप्रधान बनले नसते, असे संघात अनेकजण बोलतात.तर बनले असते कम्युनिस्ट नेता!नारायणराव तर्टे यांनी ग्वाल्हेरमध्ये संघ प्रचारक म्हणून कामास सुरुवात केली. त्यावेळी अटलबिहारी हे महाविद्यालयात ‘एसएफआय’ या कम्युनिस्ट विचारांच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. त्यावेळी संघगुरू नारायणरावांनी अटलजींना संघात आणण्याचे प्रयत्न केले आणि ते यशस्वीदेखील झाले. अटलजी संघात आले नसते, तर कदाचित ते कम्युनिस्ट नेता म्हणून तरी उदयास आले असते. हे अटलजीसुद्धा अनेकदा बोलून दाखवायचे.

नागपुरात आले की संघगुरूंची घेत भेटअटलजींचे संघ शिक्षक नारायणराव तर्टे हे नागपूरला असत. काही काम, कार्यक्रमानिमित्त अटलजींचे नागपुरात येणे व्हायचे; परंतु आपल्या संघ शिक्षकांना भेटल्याशिवाय कधी जात नसत. आपल्या प्रिय मामूची चौकशी करून ते पुढे जात. पत्र पाठवून त्यांची आस्थेने चौकशी करीत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ