शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सत्ता स्थापन करताना आश्वासनांची खैरात; आता भाजपला रामराज्याचा विसर - खा. सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 14:12 IST

भाजपच्या वचननाम्यात रामराज्याचा उल्लेख होता. त्यांना या सर्व आश्वासनांचा विसर पडल्याचे सांगत शिवसेनेचे प्रवक्ता, पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला.

अकोला: केंद्रात सत्ता दिल्यास देशात समान नागरी कायदा लागू करण्यासोबतच जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम व अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने दिले होते. मागील चार वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही या मुद्यावर भाजपने सोयीस्कर चुप्पी साधली. भाजपच्या वचननाम्यात रामराज्याचा उल्लेख होता. त्यांना या सर्व आश्वासनांचा विसर पडल्याचे सांगत शिवसेनेचे प्रवक्ता, पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘विश्व’ सांभाळण्यापेक्षा काही परिषदांनी स्वत:च्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांना सामावून घेणे अपेक्षित होते, असा टोलाही त्यांनी काही हिंदू संघटनांचा नामोल्लेख न करता लगावला.शिवसेना नेते तथा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे १९ नोव्हेंबर रोजी शहरात आगमन होत आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप तसेच कुटुंबातील महिलांना साडी-चोळी देऊन बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांनी माहिती देत असताना राम मंदिराच्या मुद्यावरून भाजपवरही निशाणा साधला. शेतकºयांना भेडसाविणाºया विविध प्रश्नांवर शिवसेनेने नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. राज्यात भाजपसोबत सत्तेत सहभागी असलो तरीही शिवसेनेने शेतमालाची खरेदी प्रक्रिया, हमीभाव व थकीत चुकारे अदा करण्यासाठी अनेकदा मोर्चे, आंदोलने छेडल्याचे खा. सावंत यांनी सांगितले. आगामी दिवसांतही सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस खरेदीसह हमीभावाच्या मुद्यावर शिवसेना कायम शेतकºयांच्या पाठीशी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करीत उग्र आंदोलनाचे संकेत दिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाArvind Sawantअरविंद सावंत