शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुलावर प्राणघातक हल्ला करणारा विद्यार्थी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 14:12 IST

१५ वर्षीय शालेय विद्यार्थ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करणारा त्याच्याच शाळेतील एका १५ वर्षीय विद्यार्थ्यास पोलिसांनी रविवारी सकाळी ताब्यात घेतले.

अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय शालेय विद्यार्थ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करणारा त्याच्याच शाळेतील एका १५ वर्षीय विद्यार्थ्यास पोलिसांनी रविवारी सकाळी ताब्यात घेतले. गंभीर जखमी असलेल्या उज्जेर हसन खान याच्यासोबत त्याचा शाळेत किरकोळ वाद झाल्यानंतर या किरकोळ वादाचा बदला या विद्यार्थ्याने रक्तरंजित रंग देऊन काढल्याचे धक्कादायक वास्तव आहे. त्यामुळे आता पालकांवर मुले सांभाळण्याची मोठी जबाबदारी आली असून, त्यांच्यातील किरकोळ वाद सहज न घेता ते सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.पातूर येथील रहिवासी अफसर खान छोटे खान यांचा मुलगा उज्जेर हसन खान हा गीता नगर परिसरातील सेंट अ‍ॅन्स शाळेचा विद्यार्थी आहे. त्यामुळे तो अकोल्यात रहिवासी असून, त्याच्यावर शनिवारी दुपारी याच शाळेतील एका विद्यार्थ्याने लोखंडी रॉडने हल्ला केला. तत्पूर्वी हल्लेखोर विद्यार्थ्याने त्याच्या एका मित्राला बोलावून त्याची दुचाकी घेतली. त्यानंतर त्या दुचाकीवर उज्जेर याला घेऊन इचे नगरातील जंगलात गेला. या जंगलात त्याने उज्जेरच्या डोक्यावर शाळेतील वादातून लोखंडी रॉडने हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेला मुलगा जंगलात पडून होता. काही लोक या परिसरात गेले असता त्यांना हा मुलगा रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तातडीने जुने शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मुलाला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविले; मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असून, तो बेशुद्धावस्थेत आहे; मात्र पोलिसांनी तपास करताना त्याच्या तीन मित्रांची कसून चौकशी केली. यामधील दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची विचारपूस केली असता ताब्यातील एकाने शाळेतील वादातून हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांना दिली. उज्जेर या मुलावर हल्ला करणारे हे अल्पवयीन असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. माय-बापांनो, लेकरं सांभाळालहानपणापासून मुलांचे हट्ट पुरविणारे आई-वडील त्यांच्यावर प्रेमाचा अतिरेक करीत असल्याने मुले गुन्हेगारी प्रवृत्तीचे होत आहेत. वयात येत असलेल्या मुलांच्या शरीरातील अंतर्गत होत असलेले बदल तसेच सहकारी विद्यार्थ्यांशी त्यांची असलेली वागणूक तपासण्याची गरज आता पालकांवर आलेली आहे. मुलांचे वाद हे किरकोळ न घेता ते जाणून घेऊन तातडीने समेट घडविण्यासाठी पालकांनीच पुढाकार घ्यावा, अन्यथा उज्जेरसारख्या विद्यार्थ्यांवर हे हल्ले होतच राहणार आहेत. बालगुन्हेगारी प्रचंड वाढतेयजिल्ह्यात बालगुन्हेगारी प्रचंड वाढत असून, याकडे आई-वडिलांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याची चर्चा पोलीस खात्यात आहे. आई-वडील दोघेही नोकरी करणारे असल्याने मुलांकडे लक्ष देण्यात वेळच नसल्यामुळे ही मुले गुन्हेगारी प्रवृत्तीचे होत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. ज्या मुलांचे आई-वडील दोघेही नोकरी करतात, त्यांची मुलेच प्राणघातक हल्ला, चोरी, मारहाणसारख्या गुन्ह्यात आरोपी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मुलांवर संस्कार न करणे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे तसेच प्रेमाचा अतिरेक करणाऱ्या आई-वडिलांची मुले आधी हट्टी होतात आणि नंतर ती गुन्हेगारी करण्याक डे वळत असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थी