शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या  आत्महत्यांची वाट पाहत आहेत का? - नाना पटोले यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 18:58 IST

अकोला : विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्यांनी विचलित होणारे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे सरकारवर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची भाषा करत होते. तेच फडणविस आता मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढे कसे बदलले. शेतकऱ्यांच्या  छोट्या मागण्याही मान्य न करणारे फडणवीस आता शेतकऱ्यांच्या  आत्महत्यांची वाट पाहत आहेत का, असा घणाघाती सवाल भाजपचे खासदार नाना पटोले यांनी मंगळवारी अकोला येथे केला.

ठळक मुद्देअकोल्यात शेतकरी आंदोलनस्थळाला दिली भेट.राज्यसरकार व प्रशासनाचा केला जाहीर धिक्कार.

- अतुल जयस्वाल

अकोला : विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्यांनी विचलित होणारे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे सरकारवर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची भाषा करत होते. तेच फडणविस आता मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढे कसे बदलले. शेतकऱ्यांच्या  छोट्या मागण्याही मान्य न करणारे फडणवीस आता शेतकऱ्यांच्या  आत्महत्यांची वाट पाहत आहेत का, असा घणाघाती सवाल भाजपचे खासदार नाना पटोले यांनी मंगळवारी अकोला येथे केला.शेतकºयांच्या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित आंदोलनाचा भाग म्हणून माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेतकºयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. प्रशासनासोबतची बोलणी फिसकटल्याने निर्धारावर ठाम असलेल्या यशवंत सिन्हा, रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो शेतकºयांना पोलिसांनी स्थानबद्ध करून पोलिस मुख्यालयात आणले. रात्रभर या ठिकाणी ठाण मांडून बसलेले यशवंत सिन्हा व शेतकºयांचे आंदोलन मंगळवारी दुसºया दिवशीही सुरुच आहे. या आंदोलन स्थळाला नाना पटोले यांनी दुपारच्या सुमारास भेट देऊन शेतकºयांना संबोधित केले. ते पुढे म्हणाले, आतापर्यंत कोणत्याच सरकारांनी शेतकºयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. शेतकऱ्यांच्या  मागण्या या रास्त असतानाही शासन आठमुठे होऊन बसले आहे. शेतकºयांना गतवर्षी विकलेल्या तुरीचे पैसे आतापर्यंत मिळत नाहीत. सरकारी खरेदी केंद्रे ही नुसती नावापुरतीच आहेत. शेतकºयांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी यशवंत सिन्हा यांच्यासारखा  केंद्रपातळीवरील मोठा नेता अकोल्यात येऊन आंदोलन करतो आणि येथील प्रशासन राज्य सरकारच्या इशाºयावर त्यांना अपमानास्पद वागणूक देते. एवढ्या मोठ्या नेत्याला साधं चहा-पाणी ही विचारले नाही. हा यशवंत सिन्हा यांचा नव्हे, तर संपूर्ण शेतकºयांचाच अपमान आहे, असा घणाघाती आरोप करीत नाना पटोले यांनी जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध केला. यावेळी यशवंत सिन्हा, रविकांत तूपकर, शेतकरी जागर मंचाचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता नाहीभापजने निवडणूकीला सामोरे जाताना कापसाला पाच हजार रुपये प्रति क्विंटल देण्याचे आश्वासन दिले होते. आता राज्यात व केंद्रातही भाजपचे सरकार आहे. कापसाला भाव मात्र चार हजारच्यावर मिळत नाही. शेतकºयांसाठी काम करण्याचे आश्वासन देऊन हे सरकार केवळ काही लोकांच्या भल्यांसाठी काम करत आहे. आणि हेच नाना पटोलेच दुखणं आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

सिन्हांच्या आंदोलनात वरुण गांधी, अरुण शौरीही येणार राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या  मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. यासाठी देशपातळीवरील नेत्यांच्या संपर्कात असून भाजपचे खासदार वरूण गांधी व माजी मंत्री अरुण शौरी यांनी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरYashwant Sinhaयशवंत सिन्हाNana Patoleनाना पटोले