शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

पाणीटंचाइ निवारणाच्या पूरक आराखडयास मंजूरी; २० उपाययोजना प्रस्तावित

By संतोष येलकर | Updated: June 9, 2024 16:26 IST

२० गावांत पाणीटंचाइ निवारणासाठी विविध २० उपाययोजना पूरक कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

अकोला: जिल्हयातील ग्रामीण भागात जून अखेरपर्यतच्या कालावधीसाठी पाणीटंचाइ निवारणाच्या पूरक कृती आराखड्यास मंजूरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी ५ जून रोजी दिला. त्यानुसार २० गावांत पाणीटंचाइ निवारणासाठी विविध २० उपाययोजना पूरक कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

१ ते ३० जूनपर्यंतच्या टप्प्यात जिल्हयातील २० गावांत पाणीटंचाइ निवारणासाठी २० उपाययोजनांच्या कामांचा पूरक कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व संबंधित यंत्रणामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजूरीसाठी सादर करण्यात आला होता. १४ लाख ८५ हजार रुपये अपेक्षित खर्चाच्या या पूरक कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजूरी देण्यात आली आहे.

पूरक आराखड्यातील गावांसह प्रस्तावित उपाययोजनांची संख्या तालुका गावे उपाययोजनाअकोला ०३ ०३बार्शिटाकळी ०८ ०८बाळापूर ०० ००पातूर ०५ ०५मूर्तिजापूर ०० ००अकोट ०२ ०२तेल्हारा ०२ ०२उपाययोजनांची अशी आहेत प्रस्तावित कामे

पूरक कृती आराखड्यात १३ विहिरींचे अधिग्रहण, ३ नवीन विंधन विहिरी व ४ कुपनलिका अशा एकूण २० उपाययोजनांची कामे पाणीटंचाइ निवारणाच्या पूरक कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली आहेत.

तातडीने करावी लागणर उपाययोजनांची कामे !

पावसाळा सुरु झाला असून, मान्सूनचा पाऊस लवकरच सुरु होणार आहे. जोरदार पाऊस सुरु झाल्यानंतर पाणीटंचाइ निवारणाच्या उपाययोजनांची कामे होवू शकणार नाही. त्यामुळे पूरक कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची कामे तातडीने करावी लागणार आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी