शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहाराचे नवीन वेळापत्रक जाहीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:19 IST

विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाने शनिवारी शाळांना नवीन वेळापत्रक दिले आहे.

अकोला: शालेय विद्यार्थ्यांचे परिपूर्ण शारीरिक पोषण व्हावे, यासाठी शासनाकडून पोषण आहार दिला जातो. २६ जूनपासून शाळेच्या पहिल्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाने शनिवारी शाळांना नवीन वेळापत्रक दिले आहे. या वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांना आहार द्यावा लागणार आहे; परंतु पोषण आहार देताना, शाळांकडून अनेकदा मेन्यु बदलविला जातो, त्यामुळे ठरलेला आहार विद्यार्थ्यांना दिला जातो की नाही, याची नियमित तपासणी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे शारीरिक पोषण व्हावे, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. या योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना सोमवार ते शनिवारपर्यंत पोषण आहार उपलब्ध केला जातो. यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी शालेय शिक्षण विभागाने पोषण आहाराचे शाळांना नवीन वेळापत्रक तयार करून दिले आहे. या वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याचा आदेश शिक्षण विभागाने संबर््ंधित शाळांना दिला आहे. सोमवार व गुरुवारी विद्यार्थ्यांना वरण-भात किंवा डाळ मिश्रीत खिचडी(तांदूळ-तूर डाळ, मूग, मसूर डाळ), मंगळवार व शुक्रवारी भात आणि हरभरा, वाटाणा, चवळी, मटकीची उसळ, बुधवार व शनिवारी भात आणि हरभरा, वाटाणा, चवळी, मटकीची उसळ द्यावी. विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ देताना, शिक्षण विभागाने त्याचे प्रमाणसुद्धा ठरवून दिले आहे. इयत्ता पहिली ते पाचवीतील प्रत्येकी विद्यार्थ्यांना तांदूळ १00 ग्रॅम, तूर, मूग, मसूर डाळ, हरभरा, वाटाणा, चवळी, मटकी, २0 ग्रॅम, तेल २0 ग्रॅम, भाजीपाला ५0 ग्रॅम, तसेच इयत्ता सहावी ते आठवीतील प्रत्येकी विद्यार्थ्यांना तांदूळ १५0 ग्रॅम, तूर, मूग, मसूर डाळ, हरभरा, वाटाणा, चवळी, मटकी, ३0 ग्रॅम, तेल ७.५ ग्रॅम, भाजीपाला ७५ ग्रॅम उपलब्ध करून द्यावा. यासोबतच मीठ, हळद, मसाला, जिरे, मोहरीचेसुद्धा प्रमाण ठरवून दिले आहे. या वेळापत्रकानुसारच शाळांनी विद्यार्थ्यांना आहार उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र