अंगणवाडीचा ठराव शासनाकडे सादर; मनपाची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 01:44 PM2018-06-25T13:44:44+5:302018-06-25T13:48:04+5:30

अकोला: महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, या उद्देशातून सुरू केलेल्या बालवाड्या बंद करून त्याऐवजी आता एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या शहरातील सर्व अंगणवाड्यांचे स्थानांतरण मनपा शाळांमध्ये केले जाणार आहे.

Anganwadi resolution presented to the government | अंगणवाडीचा ठराव शासनाकडे सादर; मनपाची लगबग

अंगणवाडीचा ठराव शासनाकडे सादर; मनपाची लगबग

googlenewsNext
ठळक मुद्दे मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१७ मध्ये बालवाडी सुरू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.मनपाच्या ३३ शाळांमध्ये बालवाडी सुरू करत, त्यासाठी मानधन तत्त्वावर ३३ स्वयंसेविका व ३३ मदतनीस यांची पदभरतीद्वारे नियुक्ती केली. सेविकांना तीन हजार रुपये, तर मदतनीस यांना एक हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


- आशिष गावंडे

अकोला: महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, या उद्देशातून सुरू केलेल्या बालवाड्या बंद करून त्याऐवजी आता एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या शहरातील सर्व अंगणवाड्यांचे स्थानांतरण मनपा शाळांमध्ये केले जाणार आहे. यासंदर्भात सर्वसाधारण सभेने मंजूर केलेला ठराव महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी एकात्मिक बाल विकास विभागाच्या आयुक्तांकडे सादर केला आहे. येत्या एक-दोन दिवसांत त्यावर निर्णय होणार असल्याने मनपा प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये बालवाडी नसल्यामुळे पटसंख्या वाढीसाठी विद्यार्थ्यांची शोध मोहीम राबवताना दमछाक होत असल्याचा गवगवा शिक्षकांकडून नेहमीच केला जातो. पटसंख्येत वाढ होत नसल्याने मनपा शाळांवर समायोजनाची परिस्थिती ओढवली. समाजातील गोरगरीब कुटुंबांना महागड्या कॉन्व्हेंटचा खर्च परवडणारा नसल्यामुळे मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१७ मध्ये बालवाडी सुरू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. मनपाच्या ३३ शाळांमध्ये बालवाडी सुरू करत, त्यासाठी मानधन तत्त्वावर ३३ स्वयंसेविका व ३३ मदतनीस यांची पदभरतीद्वारे नियुक्ती केली. सेविकांना तीन हजार रुपये, तर मदतनीस यांना एक हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुरुवातीला मानधनावर का असेना, नोकरी मिळावी म्हणून मुलाखतीला उड्या मारणाऱ्या व ‘लॉबिंग’ करणाºया सेविकांसह काही मदतनिसांनी रुजू होण्याचा आदेश घेऊनही मनपाच्या बालवाड्यांकडे सपशेल पाठ फिरवल्याची परिस्थिती होती. यादरम्यान, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या आयुक्तांनी बालवाडी व त्यांच्या अखत्यारित असणाºया अंगणवाडीच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली. मनपा प्रशासनाने शहरातील सुमारे १८० अंगणवाडीसाठी वर्ग खोल्या उपलब्ध करून दिल्यास मनपाचा आर्थिक भार कमी होण्यासोबतच अंगणवाडीतील विद्यार्थी पुढील पहिल्या वर्गासाठी मनपा शाळेत सहज प्रवेश घेऊ शकतील. यामुळे मनपा शाळांची पटसंख्या कायम राहण्यासोबतच शासनाचा उद्देशही सफल होण्यास मदत होणार आहे. ही बाब ध्यानात घेता सर्वसाधारण सभेत या विषयाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिली. तसा ठराव प्रशासनाने शासनाकडे सादर केला असून, त्याला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे.


सेविका, मदतनीस यांचा नियुक्ती कार्यकाळ संपुष्टात
मनपा प्रशासनाने बालवाडीसाठी मानधन तत्त्वावर नियुक्त केलेल्या सेविका व मदतनीस यांचा कार्यकाळ ३० एप्रिल रोजी संपुष्टात आला. तरीही आपल्याला पुनर्नियुक्ती देण्यात यावी, यासाठी बालवाडी सुरू ठेवण्याची विचित्र मागणी काही सेविकांकडून सुरू झाली आहे.


शहरातील अंगणवाड्यांचे मनपा शाळेत स्थानांतरण केल्यास विद्यार्थ्यांच्या पटसंख्येचा मूळ उद्देश सफल होणार आहे. शिवाय मनपावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
-जितेंद्र वाघ, आयुक्त मनपा

 

Web Title: Anganwadi resolution presented to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.