शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
2
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
5
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
6
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
7
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
8
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
9
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
10
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
11
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
12
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
13
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
15
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
16
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
17
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
18
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
19
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
20
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद

‘अमृत’ला मुदतवाढ नाही; अन् दंडही ठोठावला नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 5:03 PM

मुदत संपुष्टात आल्यानंतरही मनपा प्रशासनाकडून कंपनीला दंडाची आकारणी केली नसल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘अमृत’ अभियानांतर्गत शहरात जलवाहिनीचे जाळे टाकण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असताना मनपा प्रशासनासह पारदर्शी कामकाजाचा दावा करणाऱ्या सत्ताधारी भाजपाने सोयीस्कर चुप्पी साधल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे की काय, संबंधित कंपनीची काम करण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतरही मनपा प्रशासनाकडून कंपनीला दंडाची आकारणी केली नसल्याचे समोर आले आहे.केंद्र व राज्य शासनाच्या अमृत अभियान अंतर्गत संपूर्ण शहरात जलवाहिनीचे नवीन जाळे टाकणे, महान धरण ते अकोला शहरापर्यंत मुख्य जलवाहिनीचे जाळे बदलणे या व्यतिरिक्त शहरात विविध ठिकाणी नवीन ८ जलकुंभ उभारण्याच्या कामासाठी शासनाने ११० कोटी रुपये निधी मंजूर केला होता. यापैकी मनपा प्रशासनाने ८७ कोटी रुपयांची निविदा प्रकाशित केली होती. त्यावेळी ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ नामक कंपनीची जादा दराची निविदा स्वीकारण्यात आली. कंपनीच्यावतीने शहरात सर्व निकष-नियम बासनात गुंडाळून ठेवत जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांकडून सातत्याने केला जात आहे. निकषानुसार किमान साडेतीन फूट अंतरावर जलवाहिनीचे जाळे टाकणे अपेक्षित आहे. तसे न करता कंपनीकडून अवघ्या सव्वा ते दीड फूट अंतरावर जलवाहिनी टाकली जात आहे. यादरम्यान, जलवाहिनीच्या कामासाठी कंपनीला दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत डिसेंबर २०१९ मध्ये संपुष्टात आली. त्यानंतर महापालिकेने कंपनीला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. ही मुदत ३० जून रोजी संपुष्टात आली. आता कंपनीला तिसऱ्यांदा मुदतवाढ द्यावी लागणार असून, मुदतवाढीच्या कालावधीत कंपनीने काम सुरूच ठेवल्यास प्रशासनाने दंड आकारणे अपेक्षित होते.

मुदतवाढीसंदर्भात कंपनीचा प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झाला आहे. यासंदर्भात लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल.- सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, जलप्रदाय विभाग, मनपा

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका