शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अमरावती विभागात ३२३ रूग्णांना डेंग्यूसदृश तापाचा विळखा

By admin | Updated: November 9, 2014 23:36 IST

बुलडाणा जिल्ह्यात ६, अकोला ९0 तर यवतमाळमध्ये सर्वाधिक १५८ रुग्णांचा समावेश.

खामगाव (बुलडाणा): गत दोन महिन्यात अमरावती विभागात ३२३ पेक्षा जास्त रुग्णांना डेंग्यूसदृश आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने या नागरिकांमध्ये भीतीचे वा तावरण निर्माण झाले आहे. राज्यात या आजारामुळे आतापर्यंत ३३ व्यक्तींना जीव गमवावे लागले आहेत.डेंग्यूची लागण एडिस इजिप्टाय डासांमुळे होते. या डासांची उत्पत्ती साठवलेल्या पाण्यात, तसेच डबक्यांमध्ये होते. गेल्या दोन महिन्यापासून या आजाराच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अमरावती विभागात आ तापर्यंत ३२३ रुग्णांना डेंग्यूसदृश्य ताप असल्याचे निष्पन्न झाले आहे. यात बुलडाणा जिल्ह्यात ६, अकोला ९0, वाशिम 0८, अमरावती ६१, तर यव तमाळमध्ये सर्वाधिक १५८ रुग्णांचा समावेश आहे. या आजारामुळे राज्यात यावर्षी ३३ रुग्णांना जीव गमवावे लागले. आरोग्य विभाग मात्र याबाबत सुस्त असल्याचे दिसून येत आहे. या आजारामुळे रुग्णांच्या शरीरातील पांढर्‍या रक्तपेशींची संख्या झपाट्याने कमी होते. त्यामुळे अशा रुग्णांना रक्ताचे विलगीकरण करुन त्यातील आवश्यक घटक द्यावे लागतात. हा खर्च मोठय़ा प्रमाणात असतो. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हे उपचार घेणे कठीण होते. देशभरात सर्वत्र ह्यस्वच्छ भारतह्ण अभियान राबविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे; मात्र हे अभियान प्रभावीपणे राबविले जात नसल्याचे दिसून येते. या अभियानाच्या काळातच अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती वाढून, पसरत असलेली डेंग्यूची साथ चिंतेचा विषय ठरत आहे. प्रशासनाने स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवून, त्यात जनतेचा सहभाग कसा वाढेल, यादृष्टीने प्रय त्न करणे गरजेचे आहे.डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांची जिल्हानिहाय संख्या बुलडाणा -     ६अकोला -     ९0वाशिम -      0८अमरावती -  ६१यवतमाळ -  १५८